मुंबई

दोन महिन्यांपूर्वीच त्या कुटुंबानं सगळं संपवलं होतं, घरमालक भाडं घ्यायला आले तेंव्हा सगळं समजलं...

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नवी मुंबईतील तळोजा सेक्टर ९ मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापेक्षा भयानक प्रकार म्हणजे, तब्ब्ल दोन महिन्यांपूर्वीच या कुटुंबाने आत्महत्या केल्याची देखील माहिती समोर येतेय. नितेशकुमार उपाध्याय यांनी आपली पत्नी आणि दोन मुलांसह गळफास घेत आत्महत्या केलीये. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून या कुटुंबातील चार सदस्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडूनही सोसायटीतील रहिवाशांना याचा मागमूस देखील लागला नाही. नितीशकुमार हे सदर घरात आठ महिन्यांपासून राहायला आलेले आहेत. अशात गेल्या दोन महिन्यांपासून नितीश कुमार यांनी भाडं दिलं नव्हतं. डिसेंबर बसून भाडं मिळत नसल्याने घरमालकाने याठिकाणी हजेरी लावली. कुणीही दरवाजा न उघडल्याने आपल्या जवळीत डुप्लिकेट चावीने त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांना धक्का बसला. नितीश कुमार त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी यांचे कुजलेले मृतदेह त्यांना घरात आढळले.  

दरम्यान, याप्रकरणी आता नवी मुंबईच्या तळोजा पोलिसांमार्फत तपास सुरु आहे. तळोजा सेक्टर ९ मधील शिव कॉर्नर जवळील सोसायटीटाळ्या धक्कादायक आत्महत्या प्रकरणानंतर सोसायटीतील सभासद आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना धक्का बसलाय.  

two month back family from navi mumbai took extreme step but neighbor were totally unaware 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT