Vidhan Sabha 2019 congress leader rahul gandhi speech unemployment devendra fadnavis narendra modi
Vidhan Sabha 2019 congress leader rahul gandhi speech unemployment devendra fadnavis narendra modi 
मुंबई

Vidhan Sabha 2019 : मोदीजी, फडणवीसजी जरा बेरोजगारीवर बोला; राहुल गांधींची बोचरी टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं संकट आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील जाहीर सभेत भाजप सरकारवर टीका केली. कांदीवली येथे त्यांची जाहीर सभा झाली.

40 वर्षांतली सर्वांत मोठी बेरोजगारी
राहुल गांधी म्हणाले, 'देशात उद्योग व्यवसायांची अवस्था अतिशय वाईट आहे. गुजरातमध्ये हिरे उद्योगावर परिणाम झाला आहे. अनेक कारखाने बंद पडत असल्याने कामगार वर्ग रस्त्यावर येत आहे. देशात आजवरची 40 वर्षांतली सर्वांत मोठी बेरोजगारी आहे. तरुण वर्ग रस्त्यावर आला आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्राच्या गोष्टी करत आहेत. देशात इतकी भीषण परिस्थिती आहे याचा अंदाज तुम्हाला येत नाही. येत्या सहा महिन्यांत परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे. पण, सरकार त्यावर काहीच बोलायला तयार नाही.'

चीनच्या अध्यक्षांसोबत चहा
राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करत मेक इन इंडियाची घोषणा केली होती. पण, त्या मेक इन इंडियाचं झालं काय? नुकतीच त्यांनी चीनच्या अध्यक्षांची भेट घेतली. देशात बेरोजगारीने तोंडवर काढले असताना, कारखाने बंद पडत असताना, पंतप्रधान मोदी चीनच्या अध्यक्षांसोबत चहा पित बसले आहेत. मोदी कधी कॉर्बेटला जातात, चंद्राची चर्चा करतात. सामान्य माणसाचं लक्ष इतरत्र वळवण्याचा हा त्यांचा डाव आहे. देशातील जनता त्रस्त आहे. जीएसटीचा फायदा झालेला एक माणूस मला दाखवा.'

पुन्हा राफेल!
राहुल गांधी यांनी कांदीवलीच्या सभेत पुन्हा राफेलचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘राफेलमध्ये गैरव्यवहार झाला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट शब्दांत पंतप्रधान कार्यालय हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळंच राजनाथसिंह स्वतः फ्रान्सला राफेलची डिलिव्हरी घ्यायला गेले.’

राहुल गांधी म्हणतात...

  1. नोटबंदीनंतर पैसा कोणाच्या घशात गेला?
  2. शेतकरी आत्महत्येवर सरकार का बोलत नाही?
  3. जीएसटीचा फायदा कोणाला झाला आहे का?
  4. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांना सरकार बगल देत आहे का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT