...जेव्हा मजूर उत्सफुर्त घोषणा देतात... 'महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो'!
...जेव्हा मजूर उत्सफुर्त घोषणा देतात... 'महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो'! 
मुंबई

...जेव्हा मजूर उत्सफुर्त घोषणा देतात, 'महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो'!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई आणि पश्‍चिम उपनगरातून आपल्या मूळगावी जाण्यासाठी पायी निघालेल्या हजारो मजुरांना मीरा भाईंदरमधील काश्‍मिरा पोलिसांनी स्वत:हून एसटी बसची सेवा पुरवून मोलाची मदत केली आहे. अडचणीच्या वेळी केलेल्या या बहुमोल मदतीमुळे मजुरांनीही 'महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो', अशी उत्सफुर्त घोषणा देत पोलिसांचे आभार मानले. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली काश्‍मिरा पोलिसांनी ही कामगिरी केली. 

ही बातमी वाचली का? राज्यात "पूल टेस्टिंग" रखडल्या; सरकारची घोषणा हवेत विरली 

महाराष्ट्रात गेल्या 8 दिवसांत 62 मजुरांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. हे रोखण्यासाठी रस्त्याने पायी गावी जाणाऱ्या मजुरांना काश्‍मीर पोलिसांनी घोडबंदर रोडवर थांबवून त्यांच्याकडून स्थलांतर संबंधी आवश्‍यक कागदपत्रे जमा केली व त्यांना मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीपर्यंत एसटीने पोहोचविण्याची भरीव कामगिरी केली. प्रवासात मजुरांच्या खाण्यापिण्याचीही चोख व्यवस्था काश्‍मिरा पोलिसांनी केली. यासाठी अनेक सामाजिक संस्थांनीही पोलिसांना मदत केली. पोलिसांनी मजुरांची काळजी घेतल्याने मजुरांनीही जाताना हसत महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो, महाराष्ट्राचे सरकार झिंदाबादच्या घोषणा दिल्या. 

रोख 500 रुपयांची मदत 
काही सामाजिक संस्थांनी या मजुरांना रोख 500 रुपयांचीही मदत केली. 11 मे पासून ते 16 मेपर्यंत काश्‍मीरा आणि भाईंदर हद्दीतून आतापर्यंत मजुरांच्या 103 बस सोडण्यात आल्या. त्यातून 2,380 मजुरांना रवाना करण्यात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT