मुंबई: कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईमध्ये दोन मोठ्या आयोजकांनी यावर्षी उत्सवातून माघार घेतली. त्यामुळे दहीहंडी पथकांची चिंता वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव होणार का, याबबात अजून कोणतेही स्पष्टता आलोली नाही. दहीहंडी समन्वय समिती राज्य सरकारशी ऑनलाईन बैठक घेऊन उत्सवाबाबत निर्णय घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या मुंबईतील परिस्थिती पाहता आयोजक यंदा दहीहंडी उत्सव रद्द करत आहे तर काही विचारधीन आहेत. त्यामुळे या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये गणेशोत्सव बरोबर दहीहंडी उत्सव फार मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. परंतु गेल्या काही वर्षापासून दहीहंडी उत्सवाला काहीना काही ग्रहण लागत आहे. गेल्या वर्षी सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या पूरस्थितीमुळे अनेक आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द करून पारितोषिकाची मदत पूरग्रस्तांना दिली. या वर्षी कोरोनामुळे दहीहंडी उत्सवावर सावट निर्माण झाले. भाजप नेते राम कदम आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी या वर्षी प्रो दहीहंडी उत्सव रद्द केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. परंतु दहीहंडी उत्सवात सोशल डिस्टन्सिंग राखणे कठिण आहे. तसेच दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते. त्यामुळे दहीहंडी उत्सव या वर्षी रद्द करण्याची भूमिका आयोजक घेत आहे. गिरगांव येथे शिवसेना नेते पांडुरंग सकपाळ यांच्यातर्फे दहीहंडीचे आयोजन होते. पण त्यांनी यावर्षी दहीहंडी उत्सव रद्द करत असल्याचे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असे पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले.
मुंबईत कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्याबाबत अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. विविध मंडळामध्ये या बाबत चर्चा सुरू आहे. सर्वात मोठा प्रश्न उत्सवामध्ये सोशल डिस्टन्सिंग राखणे. दहीहंडी उत्सवाबाबत निर्णय़ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक घेणार आहोत. लवकरात लवकर बैठक व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे, त्यानंतर दहिहंडी उत्सव समन्वय समिती उत्सवबाबत निर्णय घेईल.
राज्य सरकार जे निर्देश देईल त्याचे पालन दहीहंडी पथक करतील, अशी माहिती दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे सचिव कमलेश भोईर यांनी दिली.
मुंबईतल्या प्रमुख मंडळांमध्ये दहीहंडी उत्सव व आयोजकांची भूमिका यावर चर्चा सुरू आहे. ती देखील राज्य सरकारच्या निर्णय़ाच्या प्रतिक्षेत आहेत. आमच्या मंडळांमध्ये आयोजकांची भूमिका व सध्याची परिस्थिती यामध्ये उत्सव साजरा करण्याबाबत चर्चा सुरु आहे. मंगळवारी मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे, असे जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले.
will take decision after state government meeting
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.