मुंबई

बारावीचा निकाल लागणार 'मे'च्या अखेरीस! वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी बारावीचे निकाल 28 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आले होते. राज्यात 18 फेब्रुवारी पासून बारावीच्या परिक्षा सुरू झाल्या आहेत. ह्या परिक्षा 20 मार्चपर्यंत पुर्ण होणार आहेत. परिक्षा पुर्ण झाल्यानंतर पेपर तपासणीसाठी मंडळाकडे पाठवले जातात.

यंदाच्या परिक्षेचाही निकाल 28 मे ला दुपारी 1 वाजता लागणार असल्याच्या शक्यता आहे. ही परिक्षा शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा मानला जातो. विद्यार्थ्यांसोबत पालकांना देखिल या परिक्षेची चिंता असते.
बारावीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 12 लाख 5 हजार 27 एवढी आहे. विज्ञान, वाणिज्य कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत. मुंबई विभागात तब्बव 3 लाख 39 हजार विद्यार्थी आहेत. इतर विद्यार्थी पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागातील असणार आहे. राज्यातील
8 लाख 53 हजार विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार विद्यार्थीनी ही परिक्षा देणार आहेत.

परिक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समूपदेशक नेमण्यात आले आहे. तर त्यांचे समन्वय ठेवण्यासाठी राज्यभरात 10 समूपदेशक नेमण्यात आले आहे. राज्यभरातील परिक्षा केद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आणि 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. 
यापरिक्षेचा निकाल मे महिण्याच्या अखेरच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Manchar Education : मोरडे फूड्स व कॉक्लिआ पुणेचा उपक्रम; ३ ते ६ वर्षांच्या कर्णबधिर मुलांसाठी मंचर येथे बोलते करण्याची ‘स्वरनाद’ शाळा सुरू

SCROLL FOR NEXT