File photo 
नांदेड

Video - डॉ. शंकरराव चव्हाण यांचा गौरवग्रंथ ठरणार प्रेरणादायी, कसा? ते वाचाच  

प्रमोद चौधरी

नांदेड : राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्रिपद तसेच केंद्रात विविध खात्यांची मंत्रिपदे भूषविल्यानंतर नांदेड नगरीतून पुढे गेलेल्या या शिस्तप्रिय-कणखर नेत्याची जीवनयात्रा २००४ च्या फेब्रुवारीमध्ये थांबली. त्यानंतर त्यांची स्मृति जपण्याचे उपक्रम साजरे होत असताना, गेल्यावर्षी १४ जुलैपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु असून त्याची सांगता पुढील महिन्यात १३ तारखेला होत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भरीव योगदान देणाऱ्या शंकररावांचा जीवनप्रवास ‘जलशंकर’ या चरित्रातून यापूर्वीच वाचकांसमोर आला होता. त्याचे लेखन करणारे लेखक डाॅ. सुरेश सावंत यांच्यावरच शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरवग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने सोपविली. कोरोनाकालीन टाळेबंदीच्या अस्वस्थ, अनिश्चित काळात त्यांनी विविध क्षेत्रांतील शंकररावांचे परिचीत, तसेच लेखक, पत्रकार, राजकारणी आणि दिवंगत नेत्याचे आप्त अनेकांना लिहिते करून आधुनिक भगीरथ या सुमारे ६०० पृष्ठांच्या ग्रंथाची मुद्रणप्रत अंतिम टप्प्यात आणली.  

विविध पैलुंवर प्रकाश टाकणारा मजकूर
शंकररावांची राजकीय कारकीर्द १९५२ मध्ये नांदेडच्या नगराध्यक्षपदापासून सुरु झाली. मग उपमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा तिचा व्यापक विस्तार झाला. या सत्ताकाळात त्यांनी राज्याच्या पाटबंधारे, वीजनिर्मिती, कृषीविकास या क्षेत्रांत भरीव व दीर्घकालीन लाभ देणारे काम केले. मुख्यमंत्री असताना लोकहिताचे अनेक निर्णय घेतले तर केंद्रात गृहमंत्री असताना अनेक जटील प्रश्न सोडविले. या प्रदीर्घ राजकीय कारगीर्दीतील त्यांच्या कार्यशैलीतील विविध पैलुंवर प्रकाश टाकणारे सत्तराहून अधिक लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत.

बालमित्रांच्या मैत्रीला उजाळा
मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत भगवंतराव देशमुख हे शंकररावांचे पैठण येथील बालमित्र होते. निशिकांत भालेराव यांनी त्यांच्या लेखात या दोन बालमित्रांच्या मैत्रीला उजाळा दिला आहे. लहानपणी शंकरराव देशपक्तीपर स्फुर्तिगीते खड्या आवाजात गात आणि वातावरण बदलून टाकीत. तसेच शंकरराव शाळेत खोड्या आणि दांडगाईसाठी प्रसिद्ध होते, असे भगवंतरावांचा हवाला देत भालेराव यांनी नमूद केले आहे. शंकरराव व अनंतराव भालेराव यांच्या भेटीदरम्यान अत्यंत अनौपचारिकपणा भालेराव यांनी त्यांच्या लेखात विस्ताराने सांगितला आहे. 

दिग्गज मंडळींच्या सहकार्यानेच गौरवग्रंथ पूर्ण
कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जनजीवन ठप्प झालेले असताना दिग्गज मंडळींनी लेखन सहकार्य केल्याने ग्रंथाचे काम अतिविलंब न होता पूर्ण करता आले. 
- डॉ. सुरेश सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

SCROLL FOR NEXT