file photo
file photo 
नांदेड

लोहा तालुक्यात पावसाचा हाहाकार, पुरात शेतकरी अडकला, दोन तासानंतर सुटका

बा.पु. गायखर

लोहा ( जि. नांदेड ) : लोहा तालुक्यातील आडगाव, चितळी धानोरा मक्ता  येथे ढगफुटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गांधी नगर (धनोरा मक्ता ) येथील शेतकरी पुरात अडकले. दोन तासानंतर शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले. खरिप पिकांची पाहणी केली असता कापूस, सोयाबीन  पीके पाण्यात गेले आहेत. 

तालुक्यातील आडगाव येथे आज झालेल्या ढगफुटीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत करण्यात यावी. अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पुरातील एका झाडाचा आश्रय घेतला

गांधीनगर येथील शेतकरी गजानन बालाजी नागरगोजे हे लोहा येथील रुग्णालयात उपचारासाठी जात असताना अचानक ढगफुटी झाली आणि धानोरा येथील नदीच्या पुरात अडकला. त्यांनी पुरातील एका झाडाचा आश्रय घेतला तब्बल दोन तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक अचानक नदीला पूर आल्यामुळे अडकले

चितळी येथील शरद पवार विद्यालयाचे काही विद्यार्थी आणि शिक्षक अचानक नदीला पूर आल्यामुळे अडकले. या भागातील काबेगाव ,हिप्परगा, चितळी आणि देऊळगाव या गावाचा संपर्क तुटला आहे.

दापशेडचे सरपंच विरभद्र राजूरे यांनी निवेदनाद्वारे मागणी

लोहा तालुक्यातील दापशेड येथे काल ( ता.. १९ ) अतिवृष्टी होऊन शेत पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरून घराची ही पडझड झाली आहे. तेव्हा याचे पंचनामे प्रशासनाने करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दापशेडचे सरपंच विरभद्र राजूरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

उभ्या पिकांचे नुकसान झाले

 पुढे निवेदनात सरपंच विरभद्र राजुरे यांनी असे नमूद केले की, दापशेड येथे गेल्या पाच ते सात दिवसापासून परतीचा पाऊस प्रचंड प्रमाणे वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पडत आहे यामुळे शेतकऱ्याचे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बाधित गावांतील शेतामधील ज्वारी, कापूस सोयाबीन, आधी पिके आडवी झाली आहेत . त्यामुळे या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा महसूल प्रशासनाने व कृषी विभागाने यांचे पंचनामे तात्काळ करावे. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व घराची पडझड झालेल्या नागरिकांना त्याच्या घरात पाणी गेले आहे. त्याला नागरिकांना  नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणी राम पाटील  क्षीरसागर यांनी केली आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT