file photo 
नांदेड

सहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून 

गंगाराम गड्डमवार

इस्लापूर (जि. नांदेड) : पैनगंगा नदीवरील मुरली गावच्या बंधाऱ्याचे अचानक पाणी सोडण्यात आल्याने एक महिला वाहून गेली असून, दोन मुलींना मात्र एका तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन त्यांचा जीव वाचवला आहे. ही घटना शनिवारी (ता. दहा) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली गावाजवळील सहस्त्रकुंड येथे घडली आहे. 

यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक हे शनिवार (ता. १०) सुटीचा दिवस असल्याने सहस्त्रकुंड धबधबा पाहाण्यासाठी सहकुंटूब सहपरिवारासह विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली (ता. उमरखेड) येथे आले होते. सर्व कुंटूब नदीकाठी उभे राहून आंनद घेत असताना या पैनगंगा नदीवर मुरली गावाच्या वरच्या बाजुने उच्च बंधाऱ्यातील अचानक पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यात ममता संतोष कुमार व तीच्या दोन मुली वाहून जात असताना आरडाओरड केल्याने मुरली येथील संदीप राठोड या तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेउन त्यांच्या दोन मुलींना वाचवण्यात यश मिळविले. पण मुलींच्या आईचा शोध लागला नाही. ममता कुमारी यांचा अद्याप शोध लागला नसल्याचे सांगुन शोध मोहीम सुरू असल्याची माहिती सहस्त्रकुंड ट्रस्टचे सचिव सतिश वाळकीकर यांनी दिली. 

कवानकर कुटुंबातील एका मुलीचा मृत्तदेह सापडला

हदगाव येथील कवानकर कुटंबातील एका मुलीचा मृत्तदेह शनिवारी (ता. १०) रात्री कुजलेल्या अवस्थेत सापडला. मात्र हा मृतदेह कवानकर यांच्या मुलीचाच आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान या सामुहीक आत्महत्या प्रकरणाची तक्रार मयत महिलेच्या भावाने इस्लापूर पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र त्या तक्रारीचे नेमके काय झाले हे मात्र अद्याप समजले नाही. घरगुती वादातून कवानकर कुटुंबियानी आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यातील अजून एक लहान मुलगी बेपत्ता असून तिचा शोध सुरु आहे. पैनगंगा नदीला पूर असल्याने शोध कार्यात अडथळा येत आहे. 

सहस्रकुंड धबधबा बनला मृत्यूचा हॉटस्पॉट

लॉकडाऊनच्या काळातही अनेक पर्यटक आपल्या परिवारासह धबधबा पाहण्यासाठी येत असतात. हा धबधबा मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर पैनगंगा नदीवर सहस्रकुंड येथे आहे. पर्यटक मोठ्या संख्येने विदर्भ व मराठवाडा तसेच तेलंगनातून येतात. मात्र मागील काही वर्षापासून या ठिकाणी सेल्‍फी किंवा पोहण्याचा मोह सुटणाऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमुन पर्यटकांना योग्य सुचना दिल्या तर हे अनर्थ टळतील असे बोलले तर वावगे ठरणार नाही. एकंदरीत हा धबधबा परिसर मृत्यूचा हॉटस्पॉट झाला की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT