Nanded News 
नांदेड

दत्ता बापूंनी जमिनीशी नातं कधीच तुटु दिले नाही  

प्रमोद चौधरी

नांदेड : हदगाव येथे श्रीकृष्ण मंदिरचे मठाचे मठाधिपती, हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांनी हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना जगाचा निरोप घेतला. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच निस्सीम भक्तावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शनिवारी हजारो भक्तांनी गर्दी केली होती. 

कोविड-१९ मुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिलेल्या आदेशाने अंत्यविधीला होणारी भक्तांची गर्दी टाळण्यासाठी दत्ता बापूंवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बापूचा जन्म १९३० मध्ये मराठा कुळात झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले. १९४७ च्या दरम्यान बापूंना हदगाव शहरातील ‘महानुभव पंथाच्या’ उखळाई मंदिरात स्वाधीन करण्यात आले होते. तेव्हापासून ते शेवटपर्यंत बापूने उखळाई मंदिरात अहोरात्र सेवा केली. संतरूपी गुणामुळे देशाच्या विविध प्रातांतील त्यांचे भक्त व चाहते बापूकडे येत होते. शब्दांशिवाय कृतीतून तत्त्वज्ञान सांगणारे बापू सदैव आपल्या भक्तांना माया देत असल्याने प्रत्येक समाजातील लोक त्यांना बापूच म्हणत. 

काय सांगतात भक्त
प्रा. डॉ. गणेश शिंदे (श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हदगाव) ः
हदगाव येथील कृष्ण मंदिराचे मठाधिपती, हदगाव भूषण, वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांनी जगाचा निरोप घेतला. एक अवलिया आपल्यातून हरवला. सबंध आयुष्यभर ज्यांनी केवळ आणि केवळ समाज हितच पाहिले. स्वतःकडे कधी त्यांनी पाहिलेच नाही. मागच्या २७ वर्षापासून मी त्यांना पाहतो त्यांनी कधी स्वतःला कपडे शिवून अंगावर घातले असतील असे आठवत नाही. कोणीतरी आहेर म्हणून दिलेले कपडेच ते घालायचे. त्यांनी कधी केसाला कंगवा लावल्याचे पाहिले नाही. त्यांनी कधी पायामध्ये वाहन वापरलेली पाहिली नाही. 

जमिनीशी नातं तुटू दिल नाही
कोणत्याही कार्यक्रमांमध्ये, कोणत्याही समारंभात गेले किंवा नेत्यांने मंचावर बोलावून खुर्चीवर बसायला सांगितले तर ते कधीच बसलेले मी पाहिले नाही. ते खाली आम जनतेमध्ये जमिनीवर बसायचे. त्यांनी आपल्या पायाचं असलेलं जमिनीशी नातं कधीच तुटू दिलं नाही. ते रस्त्यावर उभे राहिले तर त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागायची, असे त्यागी दत्ताबापू ज्यांनी हदगाव आणि हदगावच्या परिसरात आपले खूप मोठे प्रस्थ उभे केले आहे. 

निर्मळ चारित्र्याचा संत
देव उकळाई या नावाने दोन मंगल कार्यालये तसेच  गोरगरिबांचे मुले शिकली पाहिजे हा ध्यास घेऊन अव्याहतपणे एक वसतिगृह त्यांनी सुरु केले. इतकेच नाही तर मंगल कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू कुटुंबांचे विवाह या मंगल कार्यालयात निःशुल्क होत असतात. अत्यंत निष्कलंक, निर्मळ चारित्र्याचा हा संत. हा अवलिया हदगाव आणि नांदेड जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान राहिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT