Aayushyaman Bharat Scheme
Aayushyaman Bharat Scheme 
पश्चिम महाराष्ट्र

‘आयुष्यमान’मधील शंभर रुग्णालयांवर कारवाई

तात्या लांडगे

सोलापूर - देशातील सर्वसामान्यांना मोफत रुग्णसेवा देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्यमान भारत’ योजना सुरू केली. त्यामध्ये ४९२ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला. मात्र, योजनेसाठी पात्र असूनही रुग्णांना सेवा देण्यास नकार देणाऱ्या राज्यातील विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, साताऱ्यातील १०३ रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली. त्यांना दंडही ठोठावण्यात आला असून, आणखी ७० रुग्णालयांची चौकशी सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागातील 
सूत्रांनी दिली.

‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील सुमारे ८४ लाख कुटुंब पात्र आहेत. ९७१ आजारांवरील उपचारासाठी ४९२ रुग्णालयांची निवड करण्यात आली. मात्र, या योजनेतून लाभ देण्यास रुग्णालयांनी नकार दिल्याने रुग्णांना खासगी दवाखान्याची पायरी चढावी लागली. तर या योजनेसाठी पात्र असूनही काही रुग्णांना लाभ मिळाला नाही. त्याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले. त्यांच्या आदेशानुसार राज्यातील शंभर रुग्णालयांवर कारवाई करण्यात येऊन कोट्यवधींचा दंडही ठोठावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT