पश्चिम महाराष्ट्र

नागरिकांची पुनर्वसनाची तयारी असावी - CM ठाकरे

पुरस्थितीत लोकांचे किती नुकसान झाले याचा आढावा मी आज घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्नेहल कदम

सांगली (भिलवडी) : कायमस्वरुपी तोडग्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल, नागरिकांची पुनर्वसनाची तयारी आहे का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडी नागरिकांना केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, सांगली दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्यात आलेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीकरांना धीर दिला.

सोमवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कोल्हापूर विमावतळावर आगमन झालं. त्यानंतर ते मोटारीने सांगलीकडे रवाना झाले. भिलवडी येथे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कोरानाचे संकट आहे. त्यामुळे शक्यतो गर्दी टाळा. पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे, घरे वाहून गेली आहेत. मात्र प्रशासन कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. पुढे ते म्हणाले, नागरिकांनी पुनर्वसनाची तयारी करायला हवी. यादरम्यान काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतील तेव्हा सर्वांनी सहकार्य करावे. आपण सर्व मिळून या संकटातून मार्ग काढूयात. या पुरस्थितीत सांगलीमध्ये जवळपास चार लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात लोकांचे किती नुकसान झाले याचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपत्तीच्या काळात तुम्हाला पायावर उभे करायची जबाबदारी आहे. अतिवृष्टी होण्याअगोदरपासून या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे कृपया गर्दी करू नका, मास्क घालत राहा. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे. पावसाळ्यानंतर येणारे आजार होणार नाहीत, यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सर्वांची निवेदने मी घेत आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करू. पूर दरवर्षी येतो. मुख्यमंत्री, मंत्री दरवर्षी अशी पाहणी करणार, चौकशी करुन जाणार, असेच आयुष्य जगायचे का ? असा सवाल त्यांनी यावेळी अकंलखोपवासियांना केला आहे. अतिवृष्टीचा इशारा येताच या भागातील लोकांचे प्रशासनाने लगेच स्थलांतर केले आहे. जीव जाऊ दिले नाहीत. हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. थोड्याच वेळात ते कसबे डीग्रज आणि मौजे डिग्रज येथे पोहचणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! 'साेलापुरात आयटीपार्कसाठी उद्याेजकच जागा निवडणार'; हैदराबाद, पुण्यातील उद्योजकांचा लवकरच दौरा

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

Dog Rescue: ‘ती’ने पिलांना काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर; पहाडसिंगपुऱ्यात ‘श्वान परिवारा’च्या मदतीसाठी सरसावले स्थानिकांचे हात

World Archery 2025: महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला ब्राँझ; जागतिक तिरंदाजी स्पर्धा, भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी

IndiaA VS AustraliaA: चारदिवसीय लढतीत भारत अ संघाचा पराभव; यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाची बाजी

SCROLL FOR NEXT