Diabetes leads to lifestyle
Diabetes leads to lifestyle 
पश्चिम महाराष्ट्र

हे आहे मधुमेहाचे आमंत्रण

दौलत झावरे

नगर : मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, जवळपास सहा टक्के लोकसंख्या मधुमेहाने ग्रस्त आहे. जवळपास दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जणांना त्यांच्या चुकीच्या आहार-विहारामुळे मधुमेहाची शक्‍यता आहे. भारत हा मधुमेहाची राजधानी बनला आहे. पुढील काळातील आरोग्यसंकट टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागातर्फे मधुमेह प्रतिबंध व नियंत्रण मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानात जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आयुष विभाग सुरू केला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून, ऑक्‍टोबर 2008 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत जिल्हाभरात दहा लाख रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह दोन उपरुग्णालये व पाच ग्रामीण रुग्णालयांमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी चिकित्सा पद्धतीचे उपचार तज्ज्ञ डॉक्‍टरांद्वारे केले जात आहेत, तसेच योगासनांसंदर्भातही मार्गदर्शन केले जात आहे. या सेवेबरोबर या विभागातील डॉक्‍टरांकडून रुग्णांना मधुमेह आणि पथ्यांबाबत मार्गदर्शन केले जाते.

 
मधुमेह पडताळणीसाठी या विभागाने 30 समस्यांची प्रश्‍नावली तयार केली. मधुमेहाची कारणे, लक्षणे, जीवनशैली, आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्रातील मधुमेहपूर्व अवस्थेविषयीच्या मार्गदर्शनानुसार या प्रश्नांची मांडणी केली आहे.

दिलेल्या उत्तरांच्या एकत्रित स्कोअरवरून मधुमेहाची शक्‍यता कळून येते. हा उपक्रम चांगला असून, त्याचे अनेकांनी स्वागत करून आपल्याला मधुमेह झाला की नाही, याची पडताळणी करण्यासाठी प्रश्‍नावली भरून देऊन माहिती घेतली. त्यातून आपल्याला मधुमेहाची शक्‍यता नाही, हे काहींना कळले, तर काहींना मधुमेहाची दाट शक्‍यता असल्याचे स्पष्ट झाले.

त्यांच्यावर या विभागाकडून उपचार सुरू झाले आहेत. ही सर्व सेवा मोफत असतानाही त्याचा लाभ मात्र नागरिकांकडून म्हणावा त्या प्रमाणात घेतला जात नाही. 

सोशल मीडियातून प्रचार व प्रसार 
मधुमेह पडताळणी प्रश्‍नावली नागरिकांनी भरून घ्यावी, यासाठी आयुष विभागातील डॉक्‍टरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला जात आहे. त्या माध्यमातून नागरिकांना आपली मधुमेह पडताळणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे. 

वेळीच निदान झाल्यास मधुबेहर बरा हाेऊ शकताे ः डाॅ. मिरिकर

मधुमेह आजार बरा होत नाही, हा अनेकांमध्ये गैरसमज आहे. वेळीच निदान झाल्यास मधुमेह बरा होऊ शकतो, तसेच नियंत्रणातही राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने पथ्य पाळणे गरजेचे आहे. आम्ही 30 प्रश्‍न असलेली प्रश्‍नावली सामान्य नागरिकांसाठी तयार केलेली आहे. ती भरून घेतल्यानंतर मधुमेहाची शक्‍यता कळून येते. संबंधितांना पथ्ये, आहार, तसेच व्यायाम, प्राणायाम, योगोपचारांचा सल्ला दिला जातो. आवश्‍यक असल्यास औषधोपचारही केले जातात. याद्वारे भविष्यात होऊ शकणारा मधुमेह टाळता येतो. 
- डॉ. शौनक मिरीकर, आयुर्वेदतज्ज्ञ, आयुष विभाग, जिल्हा रुग्णालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT