Don't bullet train; Provide drinking water: Tanpure 
पश्चिम महाराष्ट्र

बुलेट ट्रेन नको; पिण्याचे पाणी द्या : तनपुरे 

विलास कुलकर्णी

राहुरी : ""नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे शहरातील नागरिकांना रोज माणशी 135 लिटर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना 45 लिटर पाणीपुरवठ्याची तरतूद आहे. सर्वांना सारखेच पाणी लागते; मग ग्रामीण भागावर अन्याय कशाला? शहर व ग्रामीण पाणीपुरवठ्यात तफावत कशासाठी? आम्हाला बुलेट ट्रेन नको. आमच्या ग्रामीण भागातील नागरिकांना रोज अर्धा तास पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे,'' अशा शब्दांत ग्रामीण भागातील पाणीप्रश्नावर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कारकिर्दीतील पहिल्याच प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविला. 

नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील पूरक मागणीवरील चर्चेत आमदार तनपुरे यांनी भाग घेतला. त्या वेळी राहुरी मतदारसंघातील मिरी-तिसगाव पाणीयोजनेबाबत ते म्हणाले, ""योजनेद्वारे शेवटच्या गावातील घरांमध्ये अवघे 25 ते 30 टक्के पाणी पोचते. योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात ताशी साडेतीन लाख लिटर पाणी येणे अपेक्षित आहे. ते फक्त दीड लाख लिटर येते. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोचण्यासाठी रोज पस्तीस लाख लिटर पाणी योजनेला मिळाले पाहिजे. प्रत्यक्षात अडीच ते तीन लाख लिटर पाणी मिळते. योजना चालविण्यासाठी समिती असली, तरी योजनेची मालकी जिल्हा परिषदेची आहे. योजनेच्या जलवाहिनीची गळती व पाणीचोरी बंद झाली पाहिजे. योजनेचे उत्तरदायित्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आहे. पाणीपुरवठामंत्र्यांनी जबाबदारी निश्‍चित करावी.'' 

कुरणवाडीसह 19 गावे पाणीयोजना करताना जीवन प्राधिकरण विभागाने जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभांची जमीनखरेदीची प्रक्रिया केली नाही. त्यामुळे या जमिनीचा मालक जागेवर हक्क दाखवतो. तेथे कोणी यावे, कोणी येऊ नये, हे तोच ठरवितो. योजना चालविणाऱ्या व्यक्तीने योजनेला पाणी कधी सोडायचे, कधी सोडायचे नाही, हेही तोच ठरवितो. जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभाराचा फटका योजनेला बसत आहे, याकडे आमदार तनपुरे यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

Satara Accident : शिरवळ–लोणंद रस्त्यावर भीषण अपघात; वीर धरणाजवळ दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, सात गंभीर!

SCROLL FOR NEXT