केंद्रीय पथक
केंद्रीय पथक sakal
पश्चिम महाराष्ट्र

अतिवृष्टी हानीचा पुढील आठवड्यात केंद्राला अहवाल

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यातील अतिवृष्टीसह पुरामुळे मोठी हानी झाली. खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्याची पाहणी आज (ता.५) केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पथकाने खानापूर, हुक्केरी व गोकाक तालुक्यांना भेट दिली. पाहणीनंतर येत्या ८ दिवसांत नुकसानीचा अहवाल राज्य शासन केंद्राला पाठणार आहे, अशी माहिती दिली.

केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे मुख्य लेखपाल सुशील पॉल यांच्या नेतृत्वाखाली दाखल पथकाने शासकीय कार्यालयात बैठक घेतली. येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे पीक, घर, रस्ते आणि इतर हानीची माहिती घेतली. पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक डॉ. के. मनोहरन, ऊर्जा विभागाचे शुभम गर्ग, कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आयुक्त मनोज आर्य यांचा समावेश होता.

खानापूर, हुक्केरीला पथकाला दौरा

शासकीय कार्यालयातील बैठकीनंतर पथकातील अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला. मारुतीनगरजवळ मलप्रभा ब्रीज, बॅरेजची पाहणी केली. पोल्ट्रीफार्म, पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे भेट दिली. हुक्केरी तालुक्यातील बागायत, पीकहानीची पाहणी केली. फळबाग, घर, पायाभूत सुविधा नुकसान संदर्भात तपशिल घेतला. जिनराळ क्रॉसला बागायत, बडकुंद्री होलेम्मा मंदिर, हिरण्यकेशीत घर, पायाभूत सुविधा नुकसानीची पाहणी केली केली.

यावेळी शेतकऱ्यांनी पथकाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कोबीचे पीक पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. टोमॅटो पिकाचेही नुकसान झाल्याने आर्थिक संकट ओढविले आहे. २० एकरात १२ टन पीक मिळायचे. पण, यंदा २ टन उत्पादन मिळत असल्याची व्यथा मांडली. खर्चही मिळाला नाही. यर्नाळ, इस्लामपूर, सुल्तानपूर, हरगापूरसह हुक्केरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील नुकसानीची माहिती घेतली.

आठवड्यात केंद्राला अहवाल

बेळगाव जिल्ह्यातील हानीची पाहणी करण्यात आल्यानंतर येत्या आठ दिवसांत अहवाल केंद्राला दिला जाईल, अशी माहिती अभ्यास पथकाचे सुशील पॉल यांनी दिली. नुकसानीचा अहवाल घेण्यास सुरु असून, त्यावरून सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदत जाहीर केली जाईल, असे सांगितले. पुढील आठवड्यात अहवाल पाठविला जाईल. कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आयुक्त मनोज आर्य यांनी ७६५ कोटी रुपयांचा केंद्र सरकारला दिला आहे. त्या प्रस्तावाच्या आधारे तीन सदस्यीय केंद्रीय पथकाकडून दौरा सुरू आहे. पीकहानीचे संयुक्त सर्व्हेक्षण केल्यानंतर सरकारी नियमानुसार भरपाई दिली जाईल, अशी माहिती दिली आहे.

यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिगन्नावर, शशिधर बगली, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, पशुसंवर्धन उपसंचालक डॉ.अशोक कोल्हासह खानापूर, हुक्केरीचे तहसीलदार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT