पश्चिम महाराष्ट्र

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात गोळा

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : आधीच अवकाळी पावसाने मारलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता ढगाळ हवामानाशी सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने द्राक्षे बागांवर डावण्या आणि बुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे पंढरपूर तालुक्‍यासह सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. 

यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब या फळ पिकांसह कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळीचा परिणाम संपत नाही तेच पुन्हा दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. ढगाळ हवामान आणि हवेत गारवा असल्याने द्राक्षांवर डावण्या आणि बुरी रोगाचा हमखास प्रादुर्भाव वाढतो. अशावेळी शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्यासाठी हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. 

आधीचा दुष्काळ, त्यानंतर आलेल्या अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या संकटातून शेतकरी कसे तरी सावरत असतानाच पुन्हा ढगाळ हवामानाचे नवे संकट उभे राहिले आहे. नव्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. द्राक्ष पिकांबरोबरच डाळिंबावर कुजवा आणि मर रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे डाळिंब शेतकरीही हैराण झाले आहेत. ढगाळ हवामानामुळे गव्हू पिकांवर तांबेरा पडण्याची तर हरभऱ्यावर घाटी आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. या शिवाय रब्बी ज्वारीवर देखील चिकट्या रोग येण्याची शक्‍यता आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाल्याने द्राक्षासह इतर शेती पिके देखील संकटात आली आहेत. 

अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान 
सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाल्याने पुन्हा द्राक्षांवर डावण्या आणि बुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. 
- विजयसिंह देशमुख, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कासेगाव 

पंढरपूर तालुक्‍यासाठी सहा कोटीचे अनुदान प्राप्त 
मागील महिन्यात पंढरपूर तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंढरपूर तालुक्‍यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 6 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही अनुदानाची रक्कम देखील लवकर शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT