sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

भाजपची सत्ता जनतेच्या भल्यासाठी नव्हती; जयंत पाटलांची टीका

काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर झाला, हे विसरता येणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली पण जनतेच्या भल्यासाठी त्यांची सत्ता नव्हती. भाजपच्या सुजाण नगरसेवकांनी साथ दिली. त्यामुळे आघाडीची सत्ता आली. काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर झाला, हे विसरता येणार नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व नेते, महापौर व पदाधिकारी लक्ष देतील व कॉंग्रेसचे शिकलगार यांना बहुमताने विजयी करतील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

महापालिकेच्या प्रभाग १६ च्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री जयंत पाटील यांची सभा झाली. यावेळी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर सुरेश पाटील, प्रदेश संघटक सचिव शेखर माने, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल पवार, नगरसेवक मयूर पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हारूण शिकलगार यांनी मदन पाटील यांना कायम साथ दिली. त्यांच्या निधनाने निवडणूक लागली आहे. त्यांचे पुत्र तौफिक या तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. शिकलगार कुटुंबियांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली आहे. हे लक्षात घेऊन तौफिक यांना जनतेने साथ द्यावी. भाजपला गेल्या निवडणुकीत साथ दिली. पण त्यांचा विकास पाहता काही उपयोग झाला नाही. काँग्रेसच्या तसेच भाजपमधील काही सुजाण नगरसेवकांनी दिग्विजय सुर्यवंशी यांना महापौरपदासाठी निवडून दिले. महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यापासून नवे उपक्रम राबविले जात आहेत.

विश्वजित कदम म्हणाले, हारूण शिकलगार यांनी २५ वर्षे वॉर्डाचे प्रतिनिधीत्व केले. सर्व जाती धर्माच्या लोकांच्या समस्या सोडविल्या. त्यांच्या निधनाने पोटनिवडणूक लागली. त्यांच्या विचाराचा वारसा असलेले तौफिक शिकलगार यांना उमेदवारी दिली आहे. जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. काहीजण निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला बळी पडू नका. विकासकामे करताना आम्ही राजकारण करत नाही. एकदिलाने काम करतो. महापालिकेत आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे हात बळकट करण्यासाठी तौफिकला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या संकटातही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आजच्या सभेला मोठी गर्दी झाले होती. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

भाजपमुळेच बिनविरोधला खो : जयंत पाटील

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हारूण शिकलगार यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे तौफिक शिकलगार यांना बिनविरोध करावे, यासाठी प्रयत्न केले होते. पण सतत राजकीय विचार करणार्‍यांमुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. भावनिक विषयावर कठोर निर्णय घेण्याचे काम जाणीवपुर्वक भाजपकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्यासह शिवसैनिकांनी जयंत पाटील यांना भेटून शिवसेनेचा प्रचार करावा अन्यथा कॉंग्रेसचा प्रचार थांबवा अशी विनंती केली. मात्र श्री. पाटील यांनी ही जागा कॉंग्रेसची आहे. आपण महाआघाडीत असे करायला लागलो तर कसे होणार असे सांगत शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मीनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT