पश्चिम महाराष्ट्र

महावितरणकडून महसुलावर पाणी

शिवाजी यादव

कोल्हापूर - नवीन वीज जोडणी मागणाऱ्या घरगुती, वाणिज्य ग्राहकाला ‘वीज मीटर, सर्व्हिस लाईन, वीज खांब शिल्लक नाही. ते तुमचे तुम्हीच आणा, बसवून घ्या, अथवा आम्ही देईपर्यंत वाट पाहा’, असा अजब सल्ला महावितरणकडून ऐकावा लागतो. ग्राहकाला व्यक्तिगत स्तरावर साधने गोळा करून वीज जोडणी घ्यावी लागते. यामुळे कोल्हापूर परिमंडलात दिवसाला दीड लाखाच्या, तर राज्यभरात दिवसाला २५ ते ३० लाखांच्या महसुलावर महावितरणला पाणी सोडावे लागत आहे. 

संभाव्य वीज ग्राहकाने सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर २४ तासात वीज जोडणी देण्याचा महावितरणचा प्रयत्न स्तुत्य आहे. महावितरणची सेवा ऑनलाईन आहे, तरीही वीज जोडणी मागणाऱ्या ग्राहकाला काही लाईनमन, खासगी वायरमन व कंत्राटीच्या साखळीकडून संभ्रमित माहिती दिली जाते. ही यंत्रणा ग्राहकाला मीटर, सर्व्हिस लाईन शिल्लक नाही, त्यामुळे मीटरपासून खांबापर्यंत तुम्हीच लाईन टाकून घ्या, असे यंत्रणा सांगते. यावर ‘तुम्हीच काही तरी मार्ग सांगा’, एवढे ग्राहक सांगताच, लाईनमन ‘आम्ही माणूस देतो, तो करून घेईल सगळे. त्याला ‘काही तरी’ द्या’, असे सांगितले जाते.

ग्रामीण भागात काही लाईनमनचे खासगी वायरमनशी संबंध आहेत. त्या संबंधातील एखादा खासगी वायरमन ग्राहकांच्या घरी जातो. तिथे मीटर बोर्डपासून मीटर खांबापर्यंत लाईन टाकणे, विद्युत निरीक्षकांचा रिपोर्ट आणणे, अशी कामे तो करून देतो. त्यासाठी लागणारे मटेरिलयचे पैसे व मजुरी ग्राहकांकडून घेतो. ही रक्कम किमान हजार ते चार 
हजारांपर्यंत असते. वास्तविक मीटरपासून वीज खांबापर्यंतचे लाईनचे काम महावितरणने करण्याचा संकेत आहे. त्यासाठी सर्व्हिस वायर बॉबीन, जीआय वायर(स्टे) असे महावितरणला स्वस्त मिळते. वीज मीटर महावितरण पुरवते, पण अनेकदा 
त्यांची संख्या अपुरी असल्याने १० ग्राहकांपैकी ४ ग्राहकांना स्वतःच वीज मीटर खरेदी करावे लागते. त्याचे पैसे महावितरण बिलात लावू शकत नाही. परिणामी ग्राहकाला खासगी वायरमनकडून काम करून घेण्यासाठी एक हजार ते पाच हजार रुपयापर्यंतचे साहित्य खासगी बाजारातून विकत आणून हे काम करावे लागते. येथे ग्राहकांना मनस्ताप, महावितरणचा महसूल बुडणे, खासगी बाजार पेठेचे लाभ असा तिहेरी तोटा होतो.’’

एवढे सगळे झाल्यावर महावितरणचा लाईमन येईल, कोटेशन मिळेल, ते भरले की, पुन्हा लाईनमन येऊन खासगी वायमनने बाहेर जोडलेली लाईन फक्त खांबावर जोडून वीज सुरू करेल. त्यासाठी किमान आठ दिवस ते महिना जातो. असा सारा मामला महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचत नाही.  

असा पर्याय 
गेल्या पाच वर्षांपासून अपवाद वगळता बहुतेक सर्वत्र कामाची हीच पद्धत रूढ झाली आहे. असे का झाले, याचे उत्तर महावितरणकडे मनुष्यबळ नसल्याने  सांगण्यात येते; मात्र नवीन जोडणी घेण्यापूर्वीच्या कामात वीज प्रवाह असत नाही. अशा ठिकाणी महावितरणचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वापर करून हे काम करता येते.

येथे होतोय संभ्रम
कोल्हापूर शहर, इचलकरंजी, शिरोळ, सीमा भाग, जयसिंगपूर, कोडोली, साळवण, गडहिंग्लज परिसरात काही लाईनमननी सहायक म्हणून खासगी वायरमनशी ‘अर्थपूर्ण’ संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यांच्यामार्फत असे प्रकार घडत आहेत.   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT