coming academic year students will be given educational lessons on TV and radio 
कोल्हापूर

विद्यार्थ्यांसाठी सरकार आणणार नवी योजना? आगामी शैक्षणिक वर्षात 'हे' होऊ शकतात मोठे बदल

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने काम सुरू केले आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टिव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने दूरदर्शनचे 12 तास, तर रेडिओचा दोन तासाचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र त्याचबरोबर शिक्षण विभागाने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी (चॅनेल) सुरू करावी, अशी मागणी शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाईन शाळा सुरू होणार अशी चर्चा होती. ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी स्मार्टफोन किंवा विशिष्ट प्रणालीबरोबर, चांगली इंटरनेट सुविधाही लागते. त्यासाठी खर्च आहे. परिणामी गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू शकतो. त्यामुळे कोणताही खंड न पडता सर्वांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी सरकारने दुरदर्शन व रेडिओवरून शाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज बारा तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


ऑनलाईन शाळा सुरू करण्यासाठी राज्याने दूरदर्शनवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी (चॅनेल) सुरू करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रात जोर धरू लागली आहे. दोन वर्षापूर्वी इयत्ता पहिली व आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रशिक्षण झाले. तेव्हा राज्याने गुजरात सरकारच्या वंदे गुजरात चॅनेलची मदत घेतली गेली होती. गुजरात सरकारने २०१५ मध्ये २४ तास चालणारे १६ चॅनेल सुरू केले असून या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी व शिक्षकांना दाखविले जातात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू केल्यास राज्यातील विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा, मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा, पुनर्रचित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन व शैक्षणिक कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहायला मिळू शकतात. तर शिक्षक व मुख्याध्यापकांना पुनर्रचित अभ्यासक्रम, शिक्षणात होणारे बदल याबाबत उद्बोधन होऊ शकते. त्याचा फायदा राज्यातील गुणवत्तवाढीसाठी होऊ शकतो. 

महाराष्ट्रात १ लाखाहून अधिक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. येथे सुमारे साडेसात लाख शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. तर या शाळांमध्ये २ कोटीहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. स्वतंत्र शैक्षणिक वाहिनीची (चॅनेल) निर्मिती केल्यास तंत्रस्नेही शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

राज्यातील शाळां, शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या पाहता शिक्षण विभागाने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करणे गरजेचे आहे.

-दिपक शेटे, तंत्रस्नेही शिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT