Congress MLA Satej Patil Rajesh Kshirsagar esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : काँग्रेस आमदार सतेज पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार; राजेश क्षीरसागरांचा मोठा दावा

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Congress MLA Satej Patil) यांचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचे बोट धरून विधानसभेत गेले. नंतर त्यांनी शिवसेनेला विसरून काँग्रेसला जवळ केले.

कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Congress MLA Satej Patil) यांचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय आहेत, त्यातून वाचण्यासाठी त्यांची पळताभुई थोडी झाली आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये (BJP) जातील, असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

दरम्यान, प्रभू श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे दहापैकी सात खासदार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असे लेखी पत्र दिले असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. त्याला क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले.

आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचे बोट धरून विधानसभेत गेले. नंतर त्यांनी शिवसेनेला विसरून काँग्रेसला जवळ केले. शिवसेनेचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत, असे वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का? आम्ही आजही एकसंघ आणि भक्कम आहोत. शिवसेनेचे १८ च्यावर खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही क्षीरसागर म्हणाले.

ते म्हणाले, ‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून शिंदे गटाचे आमदार होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकसभेला जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे आम्ही ठाम राहणार आहे. ‘महानंदा’वरून राऊत यांना आरोप करण्यापलीकडे दुसरे काही येत नाही. मराठी माणसाची माथी भडकवायची या पलीकडे त्या चांडाळ चौकडीला काही काम नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रावर कोणताही अन्याय होऊ देणार नाहीत, असा मला विश्‍वास आहे.’

मुरलीधर जाधव यांच्याप्रमाणेच आमची भूमिका

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून मुरलीधर जाधव यांना हटवल्याबाबत क्षीरसागर म्हणाले, ‘पहिल्यापासून आमची भूमिका हीच आहे की आमच्यावर अन्याय होतोय. आमचं मतही व्यक्त करता येत नाही. जाधव यांना कळाले आहे. बाकीच्यानाही लवकरच कळेल, लोकांचं मत आम्हाला विधानसभेत मांडता येत नव्हते, इतका दबाव आमच्यावर होता. मुरलीधर जाधव यांचे मत म्हणजे जनतेचे मत आहे. आपल्या लोकांची किंमत ठेवायची नाही. आपल्या लोकांचे ऐकायचं नाही. आपल्याच पक्षाचा वापर इतर पक्षाला कसा होईल? यासाठी प्रयत्न करायचे त्यामुळेच शिवसेनेत झालेली ही पडझड आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT