कुडित्रे - भोगावती नदीला दूषित पाणी आल्याने दोनवडे बालिंगा पाडळी खुर्द येथे नदी पात्रात मासे मृत्युमुखी पडू लागले आहेत. पाण्यालाही उग्र वास असल्याने दोनवडे बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे, आरोग्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, दूषित पाणी आले कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनवडे (ता. करवीर) येथे १७ रोजी सकाळी नदीघाटावर भोगावती नदीला दूषित पाणी आल्याचे नागरिकांना समजले. यावेळी सरपंच सारिका जाधव याचे पती सताप्पा जाधव, नवनाथ कदम, ग्रामसेवक संभाजी पाटील व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष नदीच्या घाटावर जाऊन पाण्याची पाहणी केली. यावेळी नदीच्या काठाला मृत मासे पडले होते. पाण्यालाही उग्र वास येत होता.
यावेळी दोनवडे व बालिंगा येथील तरुणांची मासे पकडण्यासाठी नदीकाठावर गर्दी झाली होती.
दोनवडे व बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीने नदीला दूषित पाणी आले, असून पाणी उकळून घ्यावे अशा सूचना दवंडी देण्यात आली आहे.
हे पण वाचा - वाढीव वीज बिलाविरोधात आता आरपारची लढाई
नदीला आलेले दूषित पाणी पुढे नागदेवाडी, हनमंतवाडी, शिंगणापूर व बालिंगा, शिंगणापूर पंप हाऊस मधून कोल्हापूरला जाणार आहे यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे असे चित्र आहे. दूषित पाणी आले कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नदीला दूषित पाणी आले आहे, पाण्याचा उग्र वास येतो, मासे मेले आहेत. पाण्याची ओटी काहीवेळा येते काही वेळा येत नाही, यामुळे नागरिकांना पाणी उकळून प्यावे अशा सूचना केल्या आहेत.
-सारिका जाधव, सरपंच दोनवडे
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.