कोल्हापूर

यंदा जादा पाऊस होणार असला, तरी महापूर राहणार नियंत्रणात!

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : यंदा जादा पाऊस होणार (heavy rain) असला, तरीही महापूर (kolhpaur flood sistuation) येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. त्याचा परिणाम जूनमध्ये दिसून आला. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या पावसापेक्षा या वेळी तो अधिक झाला. यंदा जूनमध्ये १०९ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. कर्नाटकाशी (karnatak) समन्वय आणि पावसाचे प्रमाण, अंदाज घेऊनच धरणांतील पाण्याचा विसर्ग झाला. २५ जुलैनंतर धरणांतील विसर्ग बंद केला जाईल. नियोजनातूनच महापुरावर नियंत्रण आणण्याचा यशस्वी प्रयोग होत आहे.

पाऊस अधिक झाला तर महापूर होतो आणि त्यानंतर हाहाकारातून होणारे नुकसान परवडणारे नसते. २००५ आणि २०१९ चा हा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतला आहे. त्यानंतर मात्र अनेक तांत्रिक बाजू पुढे आल्या आणि धरणांतील साठाच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २५ जुलैनंतर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून झाला. गत वर्षापर्यंत धरण भरत नाही, तोपर्यंत विसर्ग होत नव्हता. एकदा धरण भरले, की पुन्हा साठा कमी होणार नाही, याची दक्षता घेतली जात होती. सप्टेंबरअखेरपर्यंत धरण भरले नाही, तर पुढे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच हवामान आणि पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या वेगवेगळ्या विभागांतून नियंत्रण ठेवण्याचा निर्णय झाला.

परिणामी, धरण भरण्यापूर्वीच पावसाचे प्रमाण वाढले, तर त्याचा विसर्ग सुरू होतो आणि त्यातून वीजनिर्मितीला पाणी सोडले जाते. याही वर्षी राज्यात ११० टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह इतर अभ्यासकांनी वर्तविला आहे. त्यानुसार जूनमध्ये सरासरी ३९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी हा पाऊस ३२७ मिलिमीटर झाला होता. या वेळी १९० टक्के पाऊस झाला आहे.

महापूर नियंत्रणासाठी...

  • धरणातील विसर्ग योग्य ठेवणे

  • २५ जुलैनंतरच धरणांत साठा करणे

  • २५ जुलैनंतर केवळ नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस

  • कर्नाटकातील समन्वयाने पाण्याचा विसर्ग

यंदाच्या जूनमधील अनुभव

  • राधानगरी धरणातून रोज १२०० क्युसेक विसर्ग

  • जूनमध्ये गतवर्षीपेक्षा जादा पाऊस

  • राजाराम बंधारा दोन वेळा पाण्याखाली

  • पंचगंगा पाणी एकदा पात्राबाहेर

"गेल्या वीस वर्षांतील पाऊस, धरणांतील विसर्ग, पाणीसाठा आणि पाणलोट क्षेत्रातील पाऊस यांचा दररोजचा अभ्यास केला आहे. त्यानुसार जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टच्या पंधरवड्यातील पावसाने राधानगरी धरण भरते. त्यानुसार पाणीसाठा कमी केला आहे. अधिक पाऊस असेल तेव्हा धरणाचे पाणी सोडले जाणार नाही. तसेच अलमट्टी आणि कर्नाटकातील विसर्गाचाही समन्वयामुळेच महापूर नियंत्रणात राहण्याची खात्री आहे."

- रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, जलसिंचन विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT