kolhapur political News 
कोल्हापूर

'मविआ'नं घेतलेले निर्णय शिंदे-फडणवीस सरकार राजकीय हेतुने मोडित काढतंय

महाविकास आघाडी सरकारने कोणते राजकीय हीत साधण्यासाठी निवडणुकांमध्ये बदल केला नव्हता

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत असल्याचे चित्र आहे. यामुळे विरोधी गटातील नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी राजकीय हेतूने महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय मोडित काढत असून याची अमंलबजावणी आणि परिणाम याचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री मुश्रीफ यांनी मांडले आहे. महाविकास आघाडी सरकारने कोणते राजकीय हीत साधण्यासाठी निवडणुकांमध्ये बदल केला नव्हता, तर जे व्यवहार्य आहे ते पाहूनच निर्णय घेतल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. (kolhapur political News)

यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी शिंदे गटाच्या सरकारला काही गोष्टींची जाणीव करुन दिली आहे. ते म्हणाले की, जनतेमधून निवडूण आलेले सरपंच हे सदस्यांना विचारात न घेताच निर्णय घेतात. गावस्तरावर मनमानी कारभार होतो आणि त्याचा विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे सदस्यातून सरपंचाची निवड हा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय याबाबतचा प्रस्ताव त्यावेळी एकनाथ शिंदे यांनीच ठेवला होता. त्यानुसारच तो निर्णय झाला. यावर आता फेरविचार होणे गरजेचे असल्याचे मुश्रीफांनी सूचवलं आहे.

पुढे ते म्हणाले की, बाजार समिती सभापतीच्या निवडणुकीत थेट शेतकऱ्यांचा सहभाग शक्य आहे का? हा निर्णय व्यवहार्य नाही ते शिंदे सरकारच्या लवकरच लक्षात येईल. तेव्हा त्यांना माघार घ्यावी लागणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोलरील 5 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 3 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे जनतेच्या खिशावर फार मोठा सकारात्मक परिणाम होईल असे नाही. सध्याच्या दरवाढीमुळे दराच्या गणितात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे या निर्णयामुळे सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळेल असेही नसल्याचे मुश्रीफ म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये शिंदे सरकराने घेतलेल्या निर्णयावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. जनतेमधून लोकप्रतनिधी निवडला तर गाव स्तरावर होणाऱ्या परिणामांचा कोणताही अभ्यास या सरकारने केला नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मांडलेल्या प्रस्तावावरुन सदस्यातून सरपंच हा निर्णय झाल्याचेही मुश्रीफ म्हणाले. आता त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली असल्याने कदाचित त्यांनी आपल्या विचारात आणि निर्णयात बदल केल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naxalites Support Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'वोटचोरी'च्या आरोपांना नक्षलवाद्यांचाही पाठिंबा...११ पानी पत्रक जारी करत दिलं समर्थन!

Maharashtra Govt Jobs : भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती, राज्य सरकारची मान्यता

Sunday Morning Breakfast : रविवारी ब्रेकफास्टला बनवा कुरकुरीत बीटचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

SCROLL FOR NEXT