kolhpaur esakal
कोल्हापूर

सत्ता यायला काय लागतं? मुश्रीफांनी चंद्रकांत दादांना शिकवलं गणित

मुश्रीफ म्हणतात, चंद्रकांतदादा सत्ता येण्यासाठी 145 आमदार असावे लागतात, भाजपाकडे ते नाहीत

सकाळ वृत्तसेवा

मुश्रीफ म्हणतात, चंद्रकांतदादा सत्ता येण्यासाठी 145 आमदार असावे लागतात, भाजपाकडे ते नाहीत

कोल्‍हापूर : पाच राज्यांच्या (Assembly Election 2022) निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ताबदल होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे; मात्र सत्ता येण्यासाठी अगोदर १४५ आमदार असावे लागतात. जोपर्यंत भाजपकडे १४५ आमदार जमणार नाहीत, तोपर्यंत सरकार पडणार नाही. हे १४५ आमदार जमणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे राहणार, नो डाउट, असे सांगत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasam mushrif) यांनी सरकारला कसलीच अडचण नसल्याचे स्‍पष्‍ट केले. विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राष्‍ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पत्र दिले आहे. त्यात काही मुद्दे उपस्‍थित केले आहेत. यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान, राज्य शासनाचा वाईनबाबतचा निर्णय तसेच शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, त्याबाबत त्यांनी प्रश्‍‍न उपस्‍थित केला आहे. विजेबाबत यापूर्वीही चर्चा झाली. चालू वीज बिल भरून महामंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. चालू वीज बिल भरले तर वीज तोडली जाणार नाही, अशी खात्री ऊर्जामंत्री नितीन राउत (Nitin Raut) यांनी दिली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी त्यांचा आंदोलनाचा फेरविचार करावा.

संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणप्रश्‍‍नी आंदोलनाचा (Maratha Reservation) इशारा दिला आहे. मात्र त्यांनी या आंदोलनाचा निर्णय थांबवावा. मराठा आरक्षणाबाबत बांधकाममंत्री अशोक चव्‍हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यसोबत पुन्हा ‍ बैठक घेण्यात येईल चर्चा करता येईल. मात्र तूर्त आंदोलनाचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, जयप्रभा स्टुडिओ खरेदीप्रकरणी काहीच माहीत नाही, याबाबत प्रसार माध्यमातूमच आपणास समजले असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हणून संचालकांचे राजीनामे

गडहिंग्‍लज कारखाना संबंधित कंपनीने सोडून ७ ते ८ महिने झाले आहेत. मधल्या काळात तो बंद होता. जानेवारीत हा कारखाना सुरू झाला. कारखाना सुरू करण्यासाठी पैशाची कसलीही व्यवस्‍था नाही. ऊस येणे बंद झाले आहे. जर ऊस घालणारे शेतकरी, तोडणी, ओढणी यांचे पैसे दिले नाहीतर काय? असा प्रश्‍‍न संचालकांना आहे. याची जबाबदारी आपल्यावर नको यामुळे, संचालकांनी राजीनामे दिले आहेत. कारखाना सुरू व्‍हावा, यासाठी कोणी यावे, असा हेतूच नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Speed Test Video : ताशी १८० किमी वेग तरीही काठोकाठ भरलेल्या ग्लासांमधून एकही थेंब पाणी सांडले नाही...!

Alcohol Tree : ऐकू ते नवलच! 'या' 3 झाडांपासून बनते दारू...लाखो लोकांना आजही नाही माहिती

INDW vs SLW, 5th T20I: दीप्ती शर्माने नोंदवला मोठा विश्वविक्रम अन् भारतानेही रोमांचक विजयासह श्रीलंकेला दिला व्हाईटवॉश

Horoscope : उद्यापासून त्रिपुष्कर योगसह बुधादित्य राजयोग; कन्यासह 5 राशींना तिप्पट धनलाभ, नवं वर्ष सुरू होताच 3 मोठी कामं होणार पूर्ण

New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम?

SCROLL FOR NEXT