Almatti Dam esakal
कोल्हापूर

Almatti Dam च्या पाण्यामुळं कोल्हापूरला महापुराचा धोका? कृष्णा समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना साकडं

आलमट्टी, हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडावेत तसेच आलमट्टीतून विसर्ग वाढवावा, यासाठी समितीने पाठपुरावा केला.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार आलमट्टी धरणाची पातळी ३१ जुलैपर्यंत ५१३ मीटर असावी, अशी अपेक्षा होती, मात्र अपेक्षित विसर्ग नव्हता.

कोल्हापूर : कोल्हापुरातील पुराचा (Flood in Kolhapur) धोका टाळण्यासाठी आलमट्टी धरणातून (Almatti Dam) विसर्ग वाढवावा, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार सतेज पाटील तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती.

तहसीलदारांना निवेदनही दिले होते. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला. याचा परिणाम म्हणून आलमट्टी धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू झाला. त्यामुळे कोल्हापुरातील महापुराचा धोका कमी होणार आहे, अशी माहिती महापूर नियंत्रण समितीने (Krishna Flood Control Committee) दिली.

केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार आलमट्टी धरणाची पातळी ३१ जुलैपर्यंत ५१३ मीटर असावी, अशी अपेक्षा होती, मात्र अपेक्षित विसर्ग नव्हता. याच वेळी कोल्हापूर, सांगली, सातारा धरण पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर कृष्णा, पंचगंगा, नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून फुग आली.

या काळात आलमट्टी, हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडावेत तसेच आलमट्टीतून विसर्ग वाढवावा, यासाठी समितीने पाठपुरावा केला. त्यानंतर झालेल्या हालचालीनंतर आलमट्टी धरणातून दिवसात तीनवेळा विसर्ग वाढवला आहे. त्यानुसार एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कृष्णेचे पाणी, पंचगंगेचे पाणी वेगाने पुढे सरकते. त्यामुळे पुराची पाणी पातळी दोन दिवसांत कमी होईल, असा दावाही समितीने केला.

जुलैमध्ये आलमट्टीची पातळी ५१६ मीटरपेक्षा जास्त होती. वास्तविक पातळी ५१३ मीटर ठेवणे अपेक्षित होते. समितीच्या प्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाकडे रोजची आकडेवारी मिळवून घेत आलमट्टीसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील धरणाचा पाणीसाठा पातळी नोंद करून घेत वेळोवेळी विश्लेषण केले.

त्यानुसार अलमट्टीची पातळी जास्त असल्याने पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाण्याला फुग येत असून कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली हे लक्षात येताच अलमट्टीचा विसर्ग वाढविण्याची मागणी समितीचे सर्जेराव पाटील, धरणसाठा अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT