कोल्हापूर

पन्हाळ्याला रस्ता नाही, मग कार्यालये हलवूया! अनेकांचा उपद्व्याप

काही जणांचा वाघबीळवर कार्यालये नेण्याचा घाट; गडावरील मूळ रहिवाशांत संताप

आनंद जगताप

पन्हाळा : पन्हाळगड खचतोय, लोकांना ये-जा करण्यास अडचण होते, मग इथली सर्व शासकीय कार्यालये वाघबीळवर नेऊ या, असा घाट काही लोकांनी घातला आहे. हे लोक पन्हाळगडाचे मूळचे रहिवासी नाहीत, गडावर येऊन त्यांनी कमवून स्वतः च्या मिळकती केल्या आहेत आणि हेच लोक स्वार्थासाठी कार्यालये हलविण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत.

पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे, इथे छत्रपती ताराराणींची राजधानी होती. करवीर संस्थानचा कारभार इथून चालत होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे वास्तव्य होते. शाहू महाराजांची ये-जा होती. त्यांनीच राजवाड्यासमोर शिवमंदिर उभारले. थंड हवेचे ठिकाण म्हणून कै. यशवंतराव चव्हाण यांनी गडावर क वर्ग नगरपरिषद दिली. पूर्वी गडाला महालाचा दर्जा होता. आता तालुक्याचा दर्जा मिळाल्याने सर्व शासकीय कार्यालये चालू झाली आहेत. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाची स्वतः ची इमारत आहे.

अलीकडे जुन्या इमारतीशेजारी नवीन इमारत बांधली आहे आणि एका इमारतीसाठी ८० लाख रुपये मंजूर झाल्याचे समजते. प्रांत कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन स्वमालकीच्या इमारतीत आहेत. पोष्ट कार्यालयाने जागा घेतली असून, बांधकाम करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कसे असताना काही मूठभर लोकांनी इथून कार्यालये हलवण्याचा उपद्व्याप सुरू केला आहे.

याबाबत पन्हाळवासीयांत असंतोष पसरला असून, या लोकांचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी ते एकत्र आले आहेत. चार दरवाजातील रस्त्याचे दुरुस्तीचे कार्य युद्ध पातळीवर चालू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पडलेला भराव जेसीबीद्वारे दूर करण्याचे काम चालू केले आहे. खडकांची खोलीही ड्रिलिंग मशिनद्वारे तपासली जात आहे. पावसाने साथ दिल्यास आठवडाभरात दुचाकी आणि हलक्या चारचाकी वाहनांसाठी रस्ता सुरू होण्याची शक्यता आहे.

"काहीही झाले तरी पन्हाळ्यावरील कार्यालये हलविण्यात येणार नाहीत. यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांना साकडे घालू, प्रसंगी लोक आंदोलन उभारू.खचलेल्या रस्त्याचे काम वेगाने चालू आहे. आठवडाभरात नागरिकांसह, पक्षकारांची रस्त्याची सोय होईल."

- रूपाली धडेल, नगराध्यक्षा

"तालुक्यातील लोकांची सोय व्हावी आणि पन्हाळ्याला यायला रस्ता नाही म्हणून तात्पुरती काही कार्यालयाचे कामकाज वाघबीळ अगर अन्य ठिकाणी चालू करावे, रस्ता चालू झाला की कार्यालये पन्हाळ्यावर कायमस्वरूपी चालू करावी एवढेच माझे म्हणणे आहे. पन्हाळ्याशिवाय कार्यालयांना शोभा नाही."

- शिवाजी मोरे, जिल्हा परिषद सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

Pune Crime : टिपू पठाण टोळीतील गुन्हेगारांची बँक खाती गोठवली; लाखोंचा मुद्देमाल जप्त, बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू

SCROLL FOR NEXT