kolhapur politics 
कोल्हापूर

Satej Patil : 40 मंत्री नेमता येत नसतील तर राज्य चालवण्याचा निर्णय घेऊ शकतील का?

सगळेच राज्य हे अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर चालणारे असेल तर हे चिंताजनक आहे - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा

सगळेच राज्य हे अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर चालणारे असेल तर हे चिंताजनक आहे - सतेज पाटील

कोल्हापूर : लोकशाहीची व्यवस्था अस्थित्वात न आणणे हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत कॉंग्रसेचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केले. ब्रँड कोल्हापूर गौरव समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंत्रिमंडळाचा विस्तार होणे हे गरजेचे आहे. सगळेच राज्य हे अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर चालणारे असेल तर हे चिंताजनक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा लोकांशी थेट संवाद साधू शकतो यामुळे लोकशाहीत त्यांचे महत्व वेगळे आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्यामुळे राज्याचा कारभार चालावा म्हणून सचिवांना अधिकार दिले आहेत. जर ४० मंत्री नेमू शकत नाहीत, तर राज्य चालवण्याचा निर्णय हे घेऊ शकतात का असा प्रश्न सामान्य माणसांच्यामध्ये निर्माण झाला आहे.

पुढे ते म्हणाले, तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यासाठी एककीकडे हा निर्णय योग्य जरी असला तरीही लोकशाही व्यवस्थेमधील लोकप्रतिनिधी, मंत्रिपद , मंत्रिपरिषद हि व्यवस्था स्वीकारली आहे ती अस्तित्वात न आणण हि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशाने ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान आम्हीही या मोहिमेत पक्षाच्यावतीने मोठ्या संख्येने सहभागी होत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले योगदान मिळवून दिले त्यांचे कौतुक होणे देखील अपेक्षित आहे. काँग्रेस पक्षाने देखील स्वातंत्र्यात मोलाचे योगदान दिले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT