पश्चिम महाराष्ट्र

एकीला पुढे,दूसरीला मागे असे चालत नाही;पवारांची मिश्किल टिप्पणी

सकाळ वृत्तसेवा

वाई (जि. सातारा) : राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सहभाग आहे. यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यावेळी एक पक्ष सांभाळताना नाकी नऊ आले होते. आता तर महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. तिघींना घेऊन संसार करायचा असेल तर एकीला पूढे तर दूसरीला मागे ठेवून चालत नाही. सर्वांना बराेबर घेऊन चालावे लागते, अशी मिश्किल टिप्पणी खासदार शरद पवार यांनी येथे केली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाई येथील विभागीय शाखेच्या इमारतीचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार पवार म्हणाले, सध्याच्या घडीला एकीला घेऊन संसार चालवणे किती अवघड असते. इथं तर तिघीना घेऊन संसार चालवायचा आहे. सध्या तरी सगळं सुरळीत चाललं आहे. पवार यांच्या या वक्तव्यावर वाईकरांनी जाेरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
 
Video : मुंबईनंतर यांनाही हवी नाईट लाईफ

दरम्यान शेतक-यांच्या प्रश्नावर कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. सातारा जिल्ह्यात थकबाकीदारांपेक्षा नियमित कर्जफेड करणा-यां शेतक-यांची संख्या मोठी आहे. अशा शेतक-यांवर अन्याय होतो. यावर शासनाने योग्य विचार करायला हवा. सहकाराच्या माध्यमातून सामान्य शेतक-यांना स्वयंपूर्ण करून स्वतःचा पायावर उभे करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असे नमूद केले. 

श्री. पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या जिल्हा बँकेचे स्व. किसन वीर, विलासकाका पाटील, लक्ष्मणराव पाटील यांच्या सारख्या सहकारधुरीणांनी नेतृत्व केले. स्थापनेपासूनच त्यांनी बँकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शकपणे व कडक शिस्तीने करण्याची दिशा दिली. घेतलेला पैसा परत केल्याशिवाय कोकणातील लोकांना जशी झोप लागत नाही. तशीच सातारा जिल्ह्यातील सामान्य शेतक-यांनी नियमित कर्जफेड करण्याची शिस्त कायम जोपासली. विविध पक्षाचे आणि वगेवेगळ्या विचारांचे लोकांनी जिल्हा बँकेचे नेतृत्व करताना सहकारात काम करताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवल्यानेच आज जिल्हा बँक हिदुस्थानात प्रथम क्रमांकावर आहे. 

हेही वाचा - शिवेंद्रसिंहराजेंनी उठवला अजित पवारांपूढे जाेरदार आवाज

उपाध्यक्ष सुनील माने, संचालक नितीन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी वाई पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती यांच्यावतीने शरद पवार, पालक मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर घार्गे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! सहकारी टॅक्सी सेवेसाठी सरकार नवे नियम आणणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले तातडीचे आदेश

Shirur Firing Case : करडे घाटात झालेल्या अंदाधूंद गोळीबार प्रकरणानंतर अलर्ट झालेल्या पोलिस दलाने नामचीन गुंडांची धरपकड केली सुरू

Mumbai: पूरमुक्त मुंबई करणार म्हणणाऱ्या BMCला पहिल्याच पावसात धप्पा, अंधेरी सबवे पाण्यात, VIDEO VIRAL

Panhala Tourism Tax : पन्हाळागडावर पर्यटकांची उघड लूट? पर्यटन कराच्या नावाखाली वर्षाकाठी 5 ते 7 लाखांचा घोळ; 'या' गोष्टीमुळे संशय वाढला!

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन! तब्बल 4,500 बसेस धावणार, दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

SCROLL FOR NEXT