subhash_deshmukh
subhash_deshmukh 
पश्चिम महाराष्ट्र

डल्ला मारणारेच 'हल्लाबोल' करतायेत -  सुभाष देशमुख

सकाळवृत्तसेवा

सांगली : ज्यांनी आतापर्यंत डल्ला मारण्याचा उद्योग केला तेच आता "हल्लाबोल' करत आहेत अशा शब्दात सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनावर टीका केली.  

भाजप स्थापना दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,"राज्यातील कर्जमाफी योजनेसाठी 31 मार्चपर्यंतची मुदत आता 14 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. तसेच एकरकमी परतफेड (ओटीएस) साठी 30 जूनपर्यंत मुदत दिली आहे. कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी 14 एप्रिलपर्यंत करावी. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी वरील रक्कम भरली तर त्यांचा सातबारा कोरा होईल. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पाऊल उचलले आहे. बॅंकांनी देखील शेतकऱ्यांना सवलत द्यावी. पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सज्ज राहावे. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात कमी पडणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मागील कर्जमाफीचा विचार केला तर ती पाच एकराच्या आतील होती. त्याची रक्‍कम 30 ते 40 लाखापर्यंत होती. आता दीड लाखापर्यंत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात आहे. गरीब, गरजू शेतकरी वंचित राहू नये यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुका पातळीवर सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यानी तत्काळ प्रस्ताव पाठवावेत अशा सूचना दिल्या आहेत.''  

श्री. देशमुख म्हणाले, "ज्यानी आतापर्यंत डल्ला मारला ते आता हल्लाबोल करत आहेत. भाजप विरूद्ध सर्वजण एकत्र आल्यामुळे विरोधक कमकुवत झाल्याचे दिसत आहेत. स्वतंत्रपणे ते मुकाबला करू शकत नाहीत म्हणून एकत्र आले आहेत. परंतू राज्यातील जनता हुशार आहे. भाजप चांगले काम करत असल्याचे त्यांना माहित आहे. अनेक योजनांचा लाभार्थींना थेट लाभ देऊन मधले दलाल कमी केले आहे. आजपर्यंत मुठभर लोकांनाच केंद्र व राज्याच्या योजनांचा फायदा होत होता. जनतेसाठी एक रूपया दिला तर 15 पैसेच खालीपर्यंत पोहायचे. 85 पैसे खाणारे म्हणजेच डल्ला मारणारे आता आंदोलन करत असल्याचे जनतेला कळाले आहे. भाजप आयात उमेदवारांवर निवडणूक लढवते असा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीचा ढोंगीपणा सर्वांनाच माहित आहे. निवडून आलेला तो आपला आणि पराभव झालेला दुसऱ्यांचा अशी त्यांची निती आहे.'' 

विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न 
श्री. देशमुख म्हणाले, मंत्रालयातील उंदरावर आणि चहापानाच्या खर्चावरील टीका केविलवाणी म्हणावी वाटते. उंदरावरील खर्चाबाबत चंद्रकांतदादा पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चहाबाबतीत म्हणायचे तर पाहुण्याला चहा देणे ही आपली संस्कृती आहे. संस्कृती जपणे आपले काम आहे. विरोधी पक्षाने देखील चहा, जेवण आणि नाष्टा घेतला आहे. परंतू या थराला जाऊन होणारी टीका म्हणजे संस्कृती नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT