पश्चिम महाराष्ट्र

आर. आर. आबांचे 'हे' स्वप्न राष्ट्रवादी पूर्ण करणार का?

अक्षय गुंड

माढा (जि. सोलापूर) : गावोगावी निर्माण होणारे छोटे-मोठे तंटे गावातच संपवावेत. या उद्देशाने तत्कालीन आघाडी सरकारने माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. राज्यातून या योजनेला प्रतिसादही चांगला मिळाला. परंतु, गेली पाच वर्षे फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादीने सुरू केलेली ही तंटामुक्ती मोहीम थंडावली असून, तंटामुक्ती गाव समित्या फक्त नावपुरत्याच उरल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादी सत्तेत आल्याने तंटामुक्ती समिती योजना प्रभावीपणे राबविणार का? उत्सूकता आहे. 

तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून 2007 साली महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राज्यभर सुरू करण्यात आले होते. गावात निर्माण होणारे छोटे-मोठे तंटे पोलीस ठाण्यात जाण्याअगोदरच गावातच संपुष्टात आणण्याचा अभिनव प्रयोग याद्वारे राबविण्यात आला होता. गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यातून कित्येक वाद-विवाद समझोत्याने संपून गावोगावी शांततेची नांदी दिसू लागली होती. तंटामुक्ती गावांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात होती. त्यामुळे गावागावांमध्ये तंटामुक्त गाव होण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसायची. तंटे गावातच मिटू लागल्याने पोलिसांवरचा ताण देखील कमी होऊ लागला होता. परंतु 2014 ला सरकार बदल्यानंतर इतर योजना जशा थंड बस्त्यात जातात, त्याप्रमाणेच तंटामुक्ती योजनेची अवस्था झाली. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या योजनेत रस नसल्याने मागील पाच वर्षाच्या काळात या अभियानाला एकदाही प्रोत्साहन दिलेले दिसून आले नाही. शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायतींमध्येही तंटामुक्त अभियानाबाबत निरूत्साह दिसून आला. त्यामुळे तंटामुक्त समिती नावलाच आहे, का असा प्रश्न पडला होता. माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी त्यांच्या कारकीर्दीत या योजनेसाठी बरीच मेहनत घेतली होती. पण फडणवीस सरकारच्या दुर्लक्षपणामुळे आघाडी सरकारच्या या योजनेला उतरती कळा लागली. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा सत्तेत आल्याने आर. आर. पाटील यांची संकल्पना असलेली तंटामुक्त गाव ही मोहीम बळकट करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विद्यमान सरकारने लक्ष द्यावे : झाडबुके 
तंटामुक्ती समित्या फक्त कागदोपत्रीच राहिल्या आहेत. माजी गृहमंत्री स्व आर आर पाटील यांनी योजना ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे राबविली होती. शासनाकडुन गेली पाच वर्षात कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तरी विद्यमान सरकारने तर याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा उपळाई बुद्रूक (ता. माढा येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रा. मल्लिकार्जुन झाडबुके यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT