one person Dudhganga bridge One of Chand Shiradwad suicide 
पश्चिम महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या काळात गोळ्या न मिळाल्याने बिघडली मानसिकता अन् संपवली जीवनयात्राच.....

सकाळ वृत्तसेवा

बेडकिहाळ (बेळगाव) : चाँद  शिरदवाड (ता. निपाणी)
येथील एकाने मानसिक अस्वस्थतेतून दूधगंगा नदीच्या पुलावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज  सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली. राजू उत्तम कांबळे असे मयताचे नाव आहे. सदलगा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

या बाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,

राजू कांबळे यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. सध्या त्यांच्या औषधे व गोळ्या संपल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात गोळ्या न मिळाल्याने त्यांची मानसिक अस्वस्थता वाढली होती. त्याच नैराश्यातून त्यांनी दूधगंगा नदीच्या पुलावरुन उडी घेऊन आपले जीवन संपविले.ते शिरोळ येथे दत्त शेतकरी साखर कारखान्यात सेवेत होते.सदलगा पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. घटनास्थळी ठाण्याचे एएसआय एस. एस. पाटील, एस. बी. वाघमारे, एस. एच. इरगार व  एन. बी. बजंत्री यांनी उपस्थित राहून शोध कार्य केले.

तर सदलगा अग्निशामक दलाच्या जवानांनीही सुमारे दोन तासावर मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी  ४ वाजण्याच्या सुमारास  राजू कांबळे यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी सदलगा येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला. सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.मयत राजू कांबळे यांच्या मागे  आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी चाँद शिरदवाडचे अण्णा पाटील, संदीप शिंगे, किरण कांबळे, चाँद मुल्ला, विक्रम शिंगाडे, संपत बोरगल व  व युवक उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT