पश्चिम महाराष्ट्र

उत्पादकांनी कांदा फेकला शेतात

सकाळ वृत्तसेवा

नरखेड (सोलापूर) : सोलापूर बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांद्याचा भाव 20 हजारांहून थेट 500 रुपयांवर खाली खेचल्याने मसले चौधरी (ता. मोहोळ) येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी नेलेला 50 क्विंटल कांदा परत आणल्याचे शेतकरी दीपक सिरसट यांनी "सकाळ'ला सांगितले. या वेळी त्यांनी कांदा भाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कांदा मातीमोल भावाने विकण्यापेक्षा किमान खत म्हणून तरी उपयोग होईल म्हणून शेतात फेकून दिला. 

कांदा उत्पादनासाठी बियाणे, रोप तयार करणे, लागण, खुरपणी, खत, पाणी, वीज बिल, काढणी, कापणी, मजुरी व बाजार पेठेपर्यंत वाहतूक या सर्व उत्पादन प्रक्रियेचा खर्च व बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी ठरवलेला दराचा ताळेबंद वजाबाकीत व्यापारी पारंगत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा भाव 20 हजारांवर चढवून केवळ 500 रुपयांवर खाली आपटला. यातच 20 हजार रुपये दराची कसर भरून काढीत व्यापाऱ्यांनी आज मातीमोल दरात कांदा खरेदीत व्यापारी चाल दिसून आली म्हणून शेतकऱ्यांनी सोलापूर बाजारपेठेतून कांदा परत आणल्याचे चित्र सोलापूर बाजार समितीत दिसून आले. 

कांद्याचा बाजारभाव 20 हजार रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे सोलापूर बाजार समितीत शुक्रवारी व शनिवारी आंध्रप्रदेश, कर्नाटक व मराठवाड्यातून मोठ्याप्रमाणात 600हून अधिक ट्रक कांद्याची आवक झाली. याच संधीचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलत कांदा बाजार भाव जमीनदोस्त केला. दरम्यान, सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतीमालाची रात्री बरोबर दिवसाही चोर शेतमाल चोरतो. परंतु या चोरी बंद करण्यासाठी बाजार समितीकडे कोणतीही यंत्रणा नाही. शेतीमालाचे बाजारभाव व्यापारी हवे तसे ठरवतात. त्यामुळे व्यापारी व चोरांवर कुणाचेही नियंत्रण नाही हे स्पष्ट आहे. 

नियंत्रण नाही

सोलापूर बाजार समितीत व्यापारी व चोरांवर नियंत्रण कुणाचेच नाही. 
- दीपक सिरसट, शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT