समुद्राच्या अतिक्रमना मुळे दोन्ही बाजूने धोका निर्माण
समुद्राच्या अतिक्रमना मुळे दोन्ही बाजूने धोका निर्माण sakal
पश्चिम महाराष्ट्र

रत्नागिरी : मालगुंडतील समुद्राच्या अतिक्रमना मुळे दोन्ही बाजूने धोका निर्माण

राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकाजवळ असलेल्या पडवणेवाडीवर समुद्राच्या अतिक्रमणाचे मोठे संकट येऊन ठेपले आहे. गेल्या काही वर्षांपासून समुद्राने थोडा-थोडा या गावाचा किनारा गिळंकृत केला आहे. यंदा तर १५ ते २० फूट जमिनीचा भाग तुटुन तो समुद्रात वाहुन गेला आहे. त्यामुळे तेथील २५ घऱांना धोका निर्माण झाला असून उधाणाच्या भरतीवेळी ती भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या भागात धूपप्रतिबधक बंधारा घालून संरक्षण करावे, अशी मागणी पडवणेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ठिकठिकाणी समुद्राचे अतिक्रमन वाढले आहे. मिऱ्या, काळबादेवी, सोमेश्वर खाडी, गुहागर, हर्णै, नाटे आदी भागात ही परिस्थिती आहे. समुद्राचे अतिक्रमन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाय योजना करून सुमारे ३५ ते ४० ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे

बांधण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे. त्यामुळे या भागातील किनाऱ्यांची सुरक्षा होणार आहे.

तसेच मिऱ्या येथील सुमारे साडे तीन किमीचा सर्वांत मोठा धूपप्रतिबंधक बंधारा बांधला जाणार आहे. १९० कोटीचे हे काम आहे. लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. मात्र हे सर्व करत असताना तालुक्यातील पडवणेवाडी दुर्लक्षित राहिली आहे. या भागात देखील समुद्राने घुसखोरी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून समुद्र थोडा-थोडा करून काही मिटरचा किनारा गिळुन टाकला आहे. आता तर समुद्र तेथील वस्तीच्या घराजवळ येऊ लागला आहे.

पडवणेवाडी ही वरवडे ( भंडारवाडा ) या गावाचे मुलभूत अंग आहे. प्राचीन काळापासूनची प्रस्थापित आहे. परंतु या पडवणेवाडीकडे आता सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. तली खाडी ही केसपुरची खाडी म्हणून ओळख होती आता पडवणेखाडी म्हणून आताची पिढी तिला ओळखते. पडवणेवाडी खाडी आणि समुद्र याचा मध्यबिंदू आहे. याच पडवणेवाडीवर आता मोठे नैसर्गिक संकट आले आहे. पडवणेवाडीला पुढून आणि मागुन, बाजूने अशी तिन्हीकडून समुद्राचे अतिक्रमन सुरू आहे. अजस्र लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत.

त्यामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप सुरू आहे. किनाऱ्याच्या संरक्षणासाठी कोणताही बंधारा नाही. निव्वळ वाळुचा तट होता, तोही खाडीच्या पुराने व समुद्राने यंदा १५ फूट भाग तुटून वाहून गेला आहे. त्यामुळे येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. वाडीच्या संरक्षणासाठी दोन्ही बाजूने संऱक्षण बंधारा बांधावा, अशी मागणी होत आहे.

खाडी आणि समुद्राचा मध्यबिंदू म्हणून पडवणेवाडीकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये मागुन आणि पुढुन किनाऱ्याच मोठी धूप झाली आले. वाडीला संरक्षण बंधारा नाही. पडवणेवाडी पूर आणि समुद्राच्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस किनाऱ्याची धूप होत चालली आहे. यामुळे तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने तत्काळ यावर उपायोजना कराव्यात एवढी आमची मागणी आहे.

-सु. बा. सरपडवळ, स्थानिक ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT