पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत आजपासून 5 दिवस जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अजित झळके

सांगली शहरात पोलिसांनी संचलन करून इशारा दिला आहे.

सांगली : त्रिपुरा येथील जातीय दंगलीचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यासाठी मंगळवारपासून पाच दिवस जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये ही कार्यवाही केली जाणार असून त्याआधी सांगली शहरात पोलिसांनी संचलन करून इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे, की त्रपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचार झाला आहे. यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेचा फायदा घेवून काही समाज कंटक दोन समाजामध्ये, गटांमध्ये तेड निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी 6 पासून २० नोव्हेंबर मध्यरात्री 12 पर्यंत पाच व पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध केला आहे. दरम्यान, दंगलीच्या प्रकारांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानतर्फे आज निदर्शने होणार होती. त्याला परवागनी नाकारण्यात आली. त्याच ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थिकलश दर्शनाची व्यवस्था या ठिकाणीच करण्यात आली आहे. पोलिसांनी या ठिकाणीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Viral Video: पत्नी जावायाच्या प्रेमात पडल्याचे कळताच पतीने लावून दिले लग्न, टाळ्यांच्या कडकडाटात गावानेही केले स्वागत

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला; मालिकेत करण्यात आले 'हे' बदल

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT