Schools Holiday Ganesh Chaturthi Belgaum Collector Nitesh Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Ganesh Chaturthi : गणेशचतुर्थीची शाळांना सुटी कधी? राज्य सरकारनं जारी केला आदेश

सरकारने सुटीचा दिवस बदलावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही शाळांनी सोमवारी शाळा सुरू ठेवून मंगळवारी सुटी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बेळगाव : शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. १९) गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi) मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. मात्र, राज्य सरकारने (Karnataka Government) सोमवारी (ता. १८) सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे नेमकी सुटी कधी घ्यावी, असा संभ्रम शाळांसमोर (School) निर्माण झाला आहे.

सरकारने सुटीचा दिवस बदलावा, अशी मागणी होत आहे. काही शाळांनी सोमवारी शाळा सुरू ठेवून मंगळवारी सुटी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा शिक्षाणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नीतेश पाटील (Collector Nitesh Patil) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे गणेशचतुर्थीची सुटी सोमवारीच (ता. १८) जाहीर केल्याचे सांगितले.

त्यामुळे शाळांसह इतर सरकारी कर्मचाऱ्यांची अडचण होणार आहे. मंगळवारी गणेशचतुर्थी दिवशी सुटी देण्याऐवजी सोमवारी सुटी दिल्याने मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, अद्याप तरी सुटीत बदल झाला नसल्याची माहिती शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळत नसल्याने काही शाळांनी मंगळवारी शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT