सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट ! Canva
सोलापूर

सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट !

सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट ! "पुनर्वसन'च्या उपजिल्हाधिकारी चव्हाणांविरुद्ध नाराजी

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनीच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार करण्यासाठी सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांची साखळी तयार झाली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनीच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार करण्यासाठी सोलापूरच्या पुनर्वसन विभागात (Department of Rehabilitation) दलालांची (Brokers) साखळी तयार झाली आहे. या दलालांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. अशा वाढत्या प्रकारांमुळे पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण (Mohini Chavan) यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत पिराची कुरोली (ता. पंढरपूर) (Pandharpur) येथील सुरेश लामकाने यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

सातारा, पुणेसह इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारात दलालांची साखळी तयार झाली आहे. अशा दलालांकडून प्रकल्पग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्याकडून कमी किमतीत जमिनी खरेदी- विक्री व्यवहार करून दामदुप्पट दराने विक्री केली जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा दलालांमुळे सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दलालांच्या वाढत्या हस्तक्षेपाविषयी वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्याने पुनर्वसन विभागातील

अधिकाऱ्यांविषयी आता नाराजी व्यक्त केली जात आहे.

अलीकडेच पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील गट नं. 190 व 188-3 मधील जमीन प्रकल्पग्रस्त हणमंत महादेव देशमाने यांना मिळाली होती. त्याचा कब्जाही त्यांना देण्यात आला होता. दरम्यान, देशमाने यांनी ही जमीन जून 2020 मध्ये येथील शेतकरी सुरेश तुकाराम लामकाने व कुमार रामचंद्र लामकाने यांना बाजार भावाप्रमाणे विक्री केली. रीतसर खरेदी करून संबंधित शेतकऱ्याच्या ताब्यातही देण्यात आली. एक वर्षानंतर मात्र जमीन खरेदी व्यवहार अचानक रद्द केल्याचा आदेश पुनर्वसन प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी काढल्याने लामकाने या शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देताच सातबारा उताऱ्यावरील त्यांची नावे कमी केल्याने या शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे धाव घेत मोहिनी चव्हाण यांच्याविषयी तक्रार केली आहे. या प्रकरणी पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी सुरेश लामकाने यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

सायन रुग्णालयात नोव्हेंबरपासून बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी विस्तारित केंद्र सुरू, प्रत्यारोपण क्षमता वाढणार

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT