निवडणुकीच्या घोषणेनंतर घटल्या "डीसीसी'च्या ठेवी ! संचालक मंडळावर ठेवीदारांना वाटेना भरोसा  Canva
सोलापूर

निवडणुकीच्या घोषणेनंतर घटल्या 'डीसीसी'च्या ठेवी !

निवडणुकीच्या घोषणेनंतर घटल्या 'डीसीसी'च्या ठेवी ! संचालक मंडळावर ठेवीदारांना नाही भरवसा

तात्या लांडगे

बॅंकेची निवडणूक जाहीर होताच ठेवीत पुन्हा घट होऊ लागली. निवडणूक स्थगितीच्या आदेशानंतर पुन्हा ठेवी "जैसे थे' राहिल्याचे बॅंकेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सोलापूर : अनियमित कर्जवाटपामुळे तत्कालीन सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या (Reserve Bank of India) आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे (Solapur District Central Co-operative Bank) संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर बॅंकेच्या ठेवी तीन हजार 400 कोटींवरून अठराशे कोटींपर्यंत कमी झाल्या. अशा आव्हानात्मक परिस्थितीतून प्रशासकांनी चार वर्षांत ठेवी तीन हजार 300 कोटींपर्यंत नेल्या. परंतु, बॅंकेची निवडणूक जाहीर होताच ठेवीत पुन्हा घट होऊ लागली. निवडणूक स्थगितीच्या आदेशानंतर पुन्हा ठेवी 'जैसे थे' राहिल्याचे बॅंकेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

शंभर वर्षे पूर्ण केलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे जिल्ह्यातील कृषी विकासात मोठे योगदान आहे. बॅंकेमुळे राष्ट्रीयीकृत बॅंकेतील हेलपाटे कमी होऊन गावातील शाखेतूनच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होऊ लागले. मात्र, मालमत्तेच्या किमतीपेक्षाही अधिक कर्ज देणे, नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटपासह अन्य कारणांमुळे तत्कालीन राज्य सरकारने बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय घेतला. "कुंपणानेच शेत खाल्ले' अशी भावना ठेवीदार व सभासदांमध्ये होती. सप्टेंबर 2018 मध्ये बॅंकेच्या ठेवी एक हजार 858 कोटींपर्यंत खाली आल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत बॅंकेला पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान प्रशासकासमोर होते. त्यासाठी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बॅंकेच्या ठेवी वाढाव्यात, बॅंकेवरील सभासदांचा विश्‍वास कायम राहावा, यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, कुंदन भोळे आणि शैलेश कोथमिरे यांच्या प्रयत्नातून बॅंक पूर्वपदावर येत आहे. आता ठेवी तीन हजार 300 कोटींपर्यंत असून मार्च 2022 पर्यंत चार हजार कोटींपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यानंतर बॅंकेवर संचालक मंडळ येणार, पुन्हा अनियमित कर्जवाटप होईल, अशा भीतीतून ठेवीत थोडीशी घट झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. बॅंकेवर संचालक मंडळ असायलाच हवे, परंतु पुन्हा अनियमित, नियमबाह्य कर्जवाटपामुळे बॅंक अडचणीत येणार नाही, याची त्यांनी खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

चार वर्षांतील ठेवीची स्थिती...

  • 31 मार्च 2018 : 2100 कोटी

  • 31 मार्च 2019 : 2,712 कोटी

  • 31 मार्च 2020 : 2,991 कोटी

  • 31 मार्च 2021 : 3,317 कोटी

पेरणी, पीक लागवडीमुळेही ठेवी कमी

खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतीची मशागत, ऊस लागवडीसह अन्य पिकांच्या लागणीसाठी खातेदार त्यांच्या ठेवीतून रक्‍कम काढतात. यंदाही जवळपास 70 कोटींहून अधिक रुपये ठेवीदारांनी जून- जुलै- ऑगस्ट या काळात काढले. खरिपात बॅंकेने तब्बल 298 कोटींचे शेती कर्जवाटप केले आहे. दुसरीकडे, सरकारने बॅंकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढले. बॅंकेची परिस्थिती पूर्वपदावर येत असताना लगेचच निवडणूक होणार, आपल्या ठेवी सुरक्षित राहतील का, या भीतिपोटी काही ठेवीदारांनी ठेवी काढून घेतल्या, तर काहींनी ठेवी काढायची तयारी केली, अशी चर्चा त्या वेळी बॅंक अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये होती. परंतु, निवडणूक प्रक्रिया स्थगितीच्या आदेशानंतर ठेवी पुन्हा जैसे थे राहिल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT