सोलापूर

अक्कलकोटमध्ये दंड वसुलीने गर्दी नियंत्रणात

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट शहरात प्रशासनाने दंड वसुलीची कारवाई सुरू केल्याने गर्दी नियंत्रणात आहे. ही स्थिती कायम राहण्यासाठी आणखी सूक्ष्म नियोजनाची गरज व्यक्त होत आहे. 

अक्कलकोट शहरात गेल्या सोमवारी झालेल्या प्रचंड गर्दीत स्थानिकांबरोबर कर्नाटकात पायी जाणारे तसेच ग्रामीण भागातील नागरिकही होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने व्यापाऱ्यांना स्वतःहून आपले व्यवहार बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्याचबरोबर मंगळवारपासून मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी तीन जणांचे पाच पथक शहरात फिरून कारवाई करीत आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. रोज सकाळी दोन तास तसेच व्यापार सुरू ठेवणारे आज घाबरून दुकाने उघडले नसल्याचे जाणवत होते. नागरिकांनीसुद्धा गर्दी कमी केल्याचे जाणवले. कारवाई पथकाने मंगळवारी 34 जणांकडून 8900 रुपये तर बुधवारी तब्बल 73 जणांकडून 19 हजार 950 रुपये असे दोन दिवसात 28 हजार 850 रुपये दंड नियमभंग करणारे नागरिक व व्यापारी यांच्याकडून वसूल केला आहे. मास्क न घालणे, दुकानात सॅनिटायझर न ठेवणे, अंतर न ठेवणे तसेच नोंद वही न ठेवणे या कारणांसाठी दंड करण्यात आला आहे. 

हेही वाचा ः पुण्यात नियंत्रणात येतोय कोरोना
दरम्यान सोमवारी झालेल्या गर्दीनंतर सोशल डिस्टन्सचा फज्जा सपशेलपणे उडाला होता. त्यामुळे महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी अशपाक बळोरगी, प्रसन्न हत्ते, सद्दाम शेरीकर आणि नगरपरिषद कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने अक्कलकोटमधील व्यवसायिकांनी विनंती करुन 17 तारखेपर्यंत अक्कलकोट शहरामधील किराणा व मेडिकल व्यवसाय सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यास आवाहन केले. त्याला सर्व व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे तोपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. 

हेही वाचा ः अनवली तरुण जागीच ठार

... तरच व्यवहार सुरळीत 
अक्कलकोट शहरात गर्दी असण्याचे मुख्य जागा म्हणजे विजय कामगार चौकातून बसस्थानक, मल्लिकार्जुन मंदिर, कारंजा चौक व नगरपरिषद यांना जोडणारे चारही रस्ते तसेच तूप चौक ते जुना अडत बाजार आणि नगरपरिषद ते कारंजा चौक एवढे रस्ते नियंत्रित करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत. कित्येक दुकानात सॅनिटाइझर ठेवले नाही. मालक नीट रांग लावत नाहीत. त्यामुळेच व्यवहारात अस्ताव्यस्तपणा जाणवत आहे. नगरपरिषदेने दुकानदारांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यास लावली तरच सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहण्यास मदत होणार आहे. 

गरज नसताना बाहेर पडू नका 
मागील दोन महिन्यांपासून आपण स्वयंशिस्त पाळण्याविषयी सांगत आहोत. आणखी किती दिवस हेच सांगायचे. गरज नसताना दररोज बाजारात येण्याची आवश्‍यकता नाही. ज्या त्या रंगाच्या पासधारकांनीच खरेदीसाठी बाहेर पडावे. कोरोना हा आजारच असा आहे की त्याबद्दल नेहमी सांगायची गरज भासू नये. 
सर्व संरक्षक साहित्य प्रत्येकांनी वापरावेत. 
आशा राऊत, मुख्याधिकारी, अक्कलकोट , महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT