...मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे Sakal
सोलापूर

...मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे

स्वातंत्र्याची कल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळी, मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी कंगनाच्या 'त्या' विधानाचा निषेध केला आहे.

सोलापूर : वादग्रस्त सिनेअभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) भारताच्या स्वातंत्र्याविषयी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. कंगनाच्या या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी समर्थन केले. मात्र, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे (Dr. Ravindra Kolhe) यांनी कंगनाच्या 'त्या' विधानाचा निषेध केला आहे. डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे हे सध्या साकव फाउंडेशन आयोजित व्याख्यानमालेसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत.

स्वातंत्र्याच्या कल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. पण जेव्हा ब्रिटिशांचा ब्लॅक युनियन उतरवला आणि आपला तिरंगा चढला तेव्हाच स्वातंत्र्य मिळालं. दरम्यान, आजही अनेक लोक हे पारतंत्र्यातच आहेत. गरीब, दीनदुबळे, अनाथ, अपंग, वृद्ध, मूकबधिर, आदिवासी, भटका समाज यांना स्वातंत्र्य मिळालं का? हा आजही प्रश्नचिन्ह आहे. जो मनुष्य रात्री उपाशी झोपतो, तो निश्‍चितच विचार करतो, हेच का स्वातंत्र्य? यासाठीच का माझ्या वाडवडिलांनी आत्मबलिदान केलं? ज्यांच्यासाठी हे स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्यापर्यंत पोटभर अन्न मिळत नसेल तर हे सुद्धा निषेधार्ह आहे, असं वक्तव्य डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सोलापुरात केलं आहे.

डॉ. रवींद्र कोल्हे कंगना राणावतच्या वक्‍तव्याबाबत म्हणाले, जर कोणाला वाटत असेल की भारताला मिळालेलं स्वातंत्र्य पूर्णपणे नसून, ते भीक होतं, असं त्यांचं स्पष्ट मत असेल तर आणि ते त्याचं अधुरी समर्थन करत असतील तर ते निश्‍चितच निषेधार्ह आहे.

या वेळी डॉ. स्मिता कोल्हे म्हणाल्या, स्वातंत्र्य हे सगळ्यांनी मिळून मिळवलं. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांसाठी एकेक रुपया दानपेटीत देणाऱ्यांपासून जे क्रांतिकारक घराघरात लपून बसले होते, त्यांना मदत करणारे असे कितीतरी हजारो हात स्वातंत्र्यासाठी झटले. हजारो शहीद झाले. आजकालच्या घडामोडींवरून असे लक्षात येते, की छोट्या-छोट्या गोष्टींचा प्रत्येक पक्षाकडून इश्‍यू केलं जातंय. आज अनेक खेड्यापाड्यांत पायाभूत सुविधा नाहीत, रस्ते नाहीत. बाळंतीण बाईला मैलोन्‌मैल अंतरावरील हॉस्पिटलपर्यंत पायपीट करावी लागते, तर हे खरोखरंच स्वातंत्र्य आहे का? आदिवासी समाजाला अजूनही स्वातंत्र्याचा अर्थ समजत नाही. आदिवासींचा स्वातंत्र्याचा प्रश्‍न वेगळा आहे अन्‌ आज स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालंय, असं म्हणाणाऱ्यांचा प्रश्‍न वेगळा आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची कल्पना कोणती असेल, हे आपण कसं सांगू शकू? तिच्या भावना काय आहेत, हे जेव्हा ऐकू तेव्हा तिचा निषेध करायचा की समर्थन करायचं, हे ठरवू.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा लालबाग परिसरातून पुन्हा लालबाग गेटजवळ आला

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Mumbai Water Level: वर्षभराची चिंता मिटली! गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील धरणे फुल्ल; आकडेवारी आली समोर

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका! 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT