Pawar_Bhalke Canva
सोलापूर

...तर निकाल वेगळा दिसला असता ! ज्येष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष अन्‌ नडला अतिआत्मविश्वास

ज्येष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा पराभव झाला

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता पराभवाच्या कारणांची मीमांसा सुरू झाली आहे. दिवगंत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या पत्नी जयश्री भालके यांना पक्षाने उमेदवारी दिली असती तर ही जागा राष्ट्रवादीला कायम राखता आली असती, असे मत आता राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे. (Ignoring the suggestions of the seniors Bhagirath Bhalke lost the by election)

राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्षांची राज्यात सत्ता असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव हा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून पराभवाच्या कारणांचा शोध आणि बोध घेण्याचे काम सुरू आहे. दिवगंत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली असती तर निवडणुकीचा निकाल वेगळा दिसला असता, अशी मतं अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहेत.

भारत भालके यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार कोण? याविषयी फारशी चर्चा झाली नसली तरी बहुतांश निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जयश्री भालकेंनाच विधानसभेची उमेदवारी देणे हे पक्षासाठी अधिक सोयीचे होणार असल्याची भावना निवडणुकीपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील जयश्री भालकेंच्या नावाचा आग्रह धरला होता. परंतु काही स्थानिक नेतेमंडळींनी ज्येष्ठांच्या मतांचा विचार न करता, भगीरथ भालकेंना उमेदवारी देण्यासाठी श्रेष्ठींकडे आग्रह धरला.

उमेदवारी कोणाला द्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पंढरपुरात येऊन कार्यकर्त्यांची मते देखील जाणून घेतली होती. त्यामध्ये देखील अनेक ज्येष्ठांनी जयश्री भालकेंच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना केली होती. परंतु ज्येष्ठांच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करत अतिआत्मविश्वासाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भगीरथ भालकेंचे नाव जाहीर केले. तरीही पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील दिवगंत आमदार भारत भालकेंच्या प्रेमापोटी आणि सहानुभूती म्हणून भगीरथ भालकेंना जवळपास 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना 1 लाख 9 हजार 450 मते मिळाली. यामध्ये समाधान आवताडे यांनी अवघ्या 3 हजार 733 मतांनी बाजी मारली. अटीतटीच्या या लढतीमध्ये भगीरथ भालकेंचा निसटत्या मतांनी पराभव झाला. निकालानंतर आता भगीरथ ऐवजी जयश्री भालकेंना उमेदवारी दिली असती तर त्या विजयी झाल्या असत्या, अशी हुरहूर कार्यकर्त्यांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT