बार्शी तालुक्‍यातील जवळगाव प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल!
बार्शी तालुक्‍यातील जवळगाव प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल! Canva
सोलापूर

बार्शी तालुक्‍यातील जवळगाव प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल!

सकाळ वृत्तसेवा

गेल्या चार-पाच दिवसांपासून वैराग भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी चित्रा नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे.

वैराग (सोलापूर) : गेल्या चार-पाच दिवसांपासून वैराग (Vairag) भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी चित्रा नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. तर जवळगाव मध्यम प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. तसेच हिंगणी प्रकल्प देखील 62 टक्के भरला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. बार्शी तालुक्‍यात (Barshi Taluka) सर्वात मोठा हिंगणी मध्यम प्रकल्प असून त्याचबरोबर जवळगाव, ढाळे पिंपळगाव प्रकल्पाचा वैराग व परिसरातील शेतीला मोठा फायदा होतो.

नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प सध्या 81 टक्के भरला आहे. प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता 1233.10 द. ल. घ. फूट असून, मृत पाणीसाठा 202.30 द.ल.घ. फूट, उपयुक्त पाणीसाठा 1030.80 द. ल. घ. फूट, कालव्याखालील क्षेत्र - 5341 हेक्‍टर तर पाणलोट क्षेत्र 223 चौरस किलोमीटर आहे.

चित्रा नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे वैराग भागातील ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प 100 टक्के, हिंगणी 62 टक्के तर जवळगाव धरण 81 टक्के पाण्याने भरले असून आज मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी 1023 द.ल.घ. फूट पाणीसाठा आहे. तसेच वैराग - लाडोळे तलाव 66 टक्के भरला आहे. यामुळे वैराग शहराचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गतवर्षी जवळगाव मध्यम प्रकल्प 28 सप्टेंबर 2020 ला 100 टक्के भरला होता, आताही एक- दोन मोठ्या पावसात पूर्ण भरण्याची शक्‍यता आहे. जवळगाव धरणातील पाण्याचा कालव्याद्वारे हत्तीज, हिंगणी, खुंटेवाडी, धामणगाव, राळेरास, दहिटणे, सासुरे, कौठाळी, शेळगाव देगाव, वाळूज या गावांना लाभ होतो. तर धरणातील पाण्याचा उपसा सिंचनाद्वारे अंबाबाईची वाडी, जवळगाव, ज्योतिबाची वाडी, रुई, आंबेगाव, भालगाव, मिर्झनपूर, कासारी, भांडेगाव, सारोळे, चिंचखोपन ही गावे लाभ घेतात. बार्शी, तुळजापूर, मोहोळ तालुक्‍यातील मिळून अशी एकूण सुमारे 24 गावे धरणातील पाण्याचा लाभ घेतात.

हिंगणी, जवळगाव, ढाळे पिंपळगाव या तिन्ही धरणांमुळे गेल्या काही वर्षांपासून परिसरात बागायती क्षेत्रात उसाबरोबर द्राक्ष व इतर फळबागांमध्ये वाढ झाली आहे. धरण क्षेत्र परिसरात सलग दोन वर्षे समाधानकारक पाऊस पडला आहे. 13 सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र चालू झाला असून यामध्ये मोठे पाऊस असतात. त्यामुळे यंदाही तिन्ही धरणे भरून वाहतील, अशी शेतकरी वर्गात आशा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्‍चित सुटणार आहे.

बातमीदार : बलभीम लोखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT