pm NARENDRA MODIJI 
सोलापूर

मोदी सरकारचा पोस्टाच्या बचत खातेदारांना दणका

तात्या लांडगे

सोलापूर : राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील खात्याला मिनिमम बॅलन्सची अट लागू केल्यानंतर आता पोस्टाच्या (टपाल) बचत खात्यातही किमान 500 रुपये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तत्पूर्वी बचत खात्यात किमान 50 रुपये असोवत, अशी अट होती. पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्‍कम असल्यास वार्षिक शंभर रुपयांचा दंड करण्याचा निर्णय मोदी सरकारने 12 डिसेंबरला घेतला. पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्‍कम असलेली बचत खाती काही महिन्यांत बंद होतील, असेही वरिष्ठ अधिकारी सांगू लागले आहेत. दरम्यान, मोदी सरकारने हा निर्णय का घेतला, याबाबत अधिकारीच अनुत्तरीत झाले आहेत. 


बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मिडियाचा वापर वाढला आणि प्रत्येकांच्या हाती स्मार्टफोन आला. त्यामुळे टपाल कार्यालये ओस पडल्याचे चित्र असून पोस्टमनची रिक्‍त पदेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने पोस्टमनने ग्राहकांपर्यंत पोहचून त्यांच्याशी बॅंकिंग व्यवहार करण्याचेही आवाहन केले होते. मात्र, त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्‍वभूमीवर आता टपाल कार्यालयाकडील बचत खात्यात किमान पाचशे रुपये ठेवावेत, असा नियम केल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या नव्या निर्णयाबद्दल खातेदारांनी नाराजी व्यक्‍त केली असून अनेकांनी टपाल कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 

ठळक बाबी... 

  • बचत खात्यात 50 रुपयांचा बॅलन्स असावा हा नियम मोदी सरकारने बदलला 
  • पोस्टाच्या बचत खात्यात पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्‍कम असल्यास शंभर रुपयांचा वार्षिक दंड 
  • सर्वसामान्यांची बचत खाती बंद होण्याची भिती : नव्या खात्यासाठी नागरिकांनी गाठली जवळची बॅंक 
  • बचत खात्यात 500 रुपये ठेवण्याचे ग्राहकांना अधिकाऱ्यांचे आवाहन : कर्मचाऱ्यांअभावी ग्राहक अनभिज्ञच 
  • मोदी सरकारने हा निर्णय का घेतला : अधिकाऱ्यांनाही सापडेना उत्तर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT