School esakal
सोलापूर

गुणवत्तेची चिंता! कोरोनामुळे अंगणवाड्यातील ८० हजार चिमुकली थेट पहिली-दुसरीत

कोरोनामुळे मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद होत्या. तीन वर्षांत त्या वर्गातील मुले केवळ ६० दिवसच शाळेत गेली. बहुतेक मुले शिक्षणापासून दूरच राहिली. घराजवळील अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेली चिमुकली आता थेट पहिली, दुसरीच्या शाळेत गेली आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद होत्या. तीन वर्षांत त्या वर्गातील मुले केवळ ६० दिवसच शाळेत गेली. बहुतेक मुले शिक्षणापासून दूरच राहिली. घराजवळील अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेली चिमुकली आता थेट पहिली, दुसरीच्या शाळेत गेली आहेत. त्यातील बहुतेक मुलांना अंकगणित, वाचन, लेखन काहीच येत नसल्याने त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. अशा चिमुकल्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

कोरोनाच्या संकटानंतर अनेक पालकांनी त्यांची मुले इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाला घातले आहेत. तर काहींनी मुलांची गुणवत्ता वाढेल म्हणून इंग्रजी माध्यमांना पसंती दिली आहे. कित्येक वर्षांनी महापालिका व जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची संख्या वाढली आहे. पण, कोरोनामुळे दोन वर्षे घरी बसून राहिलेल्या मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना विशेष तास घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. ज्या पालकांकडे ॲन्ड्राईड मोबाइल होते, त्यांच्या मुलांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. पण, हातावरील पोट असलेल्या पालकांच्या मुलांचे काय, या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. अजूनही काही शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी १०० टक्के नाही. कोरोनामुळे अनेक घटकांचे मोठे नुकसान झाले, पण देशाची भविष्यातील ताकद, बलस्थान असलेल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेषत: गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यायला हवे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनीही शिक्षकांना तसे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने शिक्षकांना आता शाळेच्या वेळेत वैयक्तिक कारणासाठी मोबाइल वापरता येणार नाही, असे आदेश त्यांनी दिले आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा घेतल्या जाणाऱ्या मूल्यमापन चाचणीनंतर जे विद्यार्थी अंकगणित, वाचन, लेखनात पिछाडीवर आहेत, त्या मुलांच्या प्रगतीसाठी विशेष नियोजन करावे लागार आहे. अंगणवाड्यातून पहिली, दुसरी किंवा पाचवीत गेलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, हे निश्चित.

पालकांनी गुणवत्तेबाबत विचारावा जाब

जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी सर्वच शिक्षकांचे मोठे योगदान आहे. तरीपण, ज्या पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीबाबत शंका असल्यास त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, पालकांच्या बैठकीत संबंधित शाळांना जाब विचारावा. मुलांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक विशेष लक्ष देत आहेत. शाळेची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत असून शिक्षकांनी शाळा भरण्यापूवी अर्धातास अगोदर शाळेत येणे अपेक्षित आहे.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती

एकूण अंगणवाड्या

४,२१४

दरवर्षी पहिलीत जाणारी मुले

३९,०००

झेडपी शाळातील पहिलीचे विद्यार्थी

३५,७००

इयत्ता दुसरीतील विद्यार्थी

३९,४००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT