Mumbai-Chennai_ 
सोलापूर

रेल्वे लॉक डाऊन ! मार्चएण्डपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्यासाठी 31 मार्चपर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. शहरांमधील मेट्रो सुरु ठेवायची की बंद, तेथील स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असेही केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आगामी दोन हजार 400 तास रेल्वे वाहतूक बंद करीत प्रवाशांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. 


महाराष्ट्रासह देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रविवारी (ता. 22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. मात्र, कोरोनाची भिती ऑगस्टपर्यंत असेल, असे तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना घरात मनोजंन व्हावे या हेतूने महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन आगामी चोवीशे तास रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. 


राज्य सरकारला केंद्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी विविध शहरांमध्ये कलम 144 अंतर्गत जमाव बंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यावरही बंदी घातली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जात आहे. रस्त्यांवर, बस स्थानके, रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जात आहे. कोरोना संशयीतांना 14 दिवस घरी राहण्याच्या सूचना देऊनही ते रेल्वेने प्रवास करु लागले आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या मोठी असते आणि रेल्वे प्रशासनाला पुरेशा प्रमाणात थर्मल स्क्रिनिंग मशिन उपलब्ध झालेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 


रेल्वे 31 मार्चपर्यंत धावणार नाही 
केंद्रीय मंत्रालयाने नुकताच निर्णय घेतला असून त्यानुसार 31 मार्चपर्यंत आगामी दोन हजार 400 तास देशातील कोणत्याही मार्गावर एकही रेल्वे गाडी धावणार नाही. त्यामध्ये मेल, पॅसेंजर, लोकल गाड्या धावणार नाहीत. 
- प्रदिप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT