MLA Shahjibapu Patil esakal
सोलापूर

Solapur : केंद्र सरकारच्या पीकनिहाय निकषापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारचे धोरण : आ. शहाजीबापू पाटील

तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

सांगोला : तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या चार मंडळ व इतर मंडळामध्येही नुकसान झालेल्या पिकांचे सर्व पंचनामे केले जातील. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे दहा गुंठेही जमीन राहणार नाही. केंद्र सरकारच्या पीकनिहाय निकषानुसार नुकसान भरपाई जाहीर केली जाते त्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे शिंदे - फडणवीस सरकारचे देण्याचे धोरण असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना पंचनामेबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांनी सूचना केल्या.

सांगोला तालुक्यातील सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या संगेवाडी मंडळमधील संगेवाडी व मांजरी या गावात नुकसानग्रस्त पिकांचे पाहणी करण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील आले होत. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार अभिजीत सावर्डे - पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, मंडलाधिकारी बाळासाहेब कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रविण झांबरे, कृषिसेवक अलका चव्हाण यांच्यासह मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. ही चार मंडळ सोडूनही इतर मंडळांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे या चार मंडळासह इतर मंडळांमध्येही ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येतील.

कोणताही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची दखल निश्चितपणे घेतली जाईल. केंद्र सरकारचे पीकनिहाय जे निकष आहेत त्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे शिंदे - फडणवीस सरकारचे धोरण आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखे परिस्थिती तालुक्यातील फक्त चार मंडळांमध्येच आहे.

ओला दुष्काळासाठीचे अनेक नियम व निकष आहेत. आम्ही तशी मागणी करू परंतु शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. पंचनामे करण्यापासुन कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत दखल घ्यावी अशा सूचनाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी आधिकाऱ्यांना केल्या.

मी पाठपुरावा करतो, तुम्ही काळजी घ्या

नुकसान झालेल्या पिकांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी अधिकारी व शासनदरबारी पाठपुरावा निश्चितपणे करेन. परंतु तुम्हीही आधिकाऱ्यांकडून नुकसान पिकांचे पंचनामे करुन घेण्याची काळजी घ्या असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT