police sakal
सोलापूर

वाहतूक पोलिसांचे आदेश! दुसऱ्यांदा नियम मोडू नका, नाहीतर वाहन होणार जप्त

शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ ते २२ मे या २२ दिवसांत बेशिस्त वाहनचालकांना ३३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा दंड केला आहे. आता एकाच वाहनचालकाने दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ते वाहन जप्त केले जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील वाहनांची संख्या वाढली असून अवजड वाहने रात्रभर शहरातून जात आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून वाहनचालकांचा बेशिस्तपणा पण वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ ते २२ मे या २२ दिवसांत बेशिस्त वाहनचालकांना ३३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा दंड केला आहे. आता एकाच वाहनचालकाने दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ते वाहन जप्त केले जाणार आहे.

शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तीन दिवस विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्व पोलिस ठाण्याच्या परिसरात वाहनांची तपासणी केली जात आहे. चार वाहनांची तपासणी केल्यावर त्यात १५ वाहने संशयित आढळली आहेत. त्याचा आरटीओच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. रिक्षा भाडेवाढ आणि त्यात होणारी लूट, या अनुषंगाने पण २०० रिक्षांची तपासणी झाली. अनेकदा परगावाहून आलेल्या प्रवाशांकडून जास्त भाडे घेतले जाते. वाद होतात, पण प्रवासी बाहेरचे असल्याने त्यांना पोलिसात तक्रार देता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अचानक रिक्षांची पण तपासणी केली. दुचाकीवरून ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा वाहनांवर विशेष वॉच ठेवला गेला. तशी १५ वाहने वाहतूक पोलिसांनी जप्त केली. पण, एकाच वाहनचालकाने दुसर्‍यांदा वाहतूक नियम मोडला, तर त्याचे वाहन जप्तही केले. त्यांच्यावर खटला भरून न्यायालयातून ते वाहन सोडावे लागणार आहे. दरम्यान, शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था सुधारावी, सर्वांनी नियम पाळावेत, वाहतूक कोंडी होणार नाही, अपघात कमी होतील, यासाठी हा खटाटोप सुरू करण्यात आला आहे.

आता कारवाई सुरूच राहणार
बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. वाहतूक कोंडीलाही तेच जबाबदार असतात. त्यामुळे त्यांनी वाहतूक नियम तंतोतंत पाळावेत, वाहतूक व्यवस्था सुधारावी, या हेतूने त्यांना दंड करण्यात आला. २२ दिवसांत चार हजार ६२१ केसेस करीत साडेतीन लाखांचा दंड रोखीने वसूल केला गेला आहे. तर ३० लाख ४५ हजार ४०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिसांसाठी प्रत्येक चौकात छत्र्या उभारल्या गेल्या आहेत.

शहरात हेल्मेट सक्ती आहे की नाही?
कोणत्याही मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करताना प्रत्येक दुचाकीस्वाराकडे हेल्मेट असायला हवे. जेणेकरून त्याचा अपघात झाला तर जीव जाणार नाही, हा त्यामागील हेतू आहे. पण, ग्रामीण भागात किंवा महामार्गावर त्या अनुषंगाने काहीच कारवाई दिसत नाही. दुसरीकडे शहरात हेल्मेट सक्ती आहे की, याबाबतीत पोलिस स्पष्टपणे काहीच सांगत नाहीत. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा बेशिस्तपणा वाढल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT