Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha Canva
सोलापूर

"कोपर्डीच्या कन्येला न्याय मिळण्यासाठी काढावा लागेल मोर्चा!'

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

कोपर्डीच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ त्या कन्येला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

सोलापूर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली असून, अद्यापही त्या निष्पाप कन्येला न्याय मिळाला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्यात आली होती, मात्र जर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या केसच्या निकालाला पाच वर्षे लागत असतील तर मग जनरल केसचे निकाल काय असतील? आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण (Maratha reservation) मिळावे म्हणून 58 मोर्चे काढण्यात आले, मात्र यापुढे कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढावा लागेल, असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव (Anant Jadhav) यांनी दिला आहे. कोपर्डीच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ त्या कन्येला मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याप्रसंगी अनंत जाधव बोलत होते. कोपर्डी घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या घराघरात उमटले होते. एक वर्षभर हे प्रकरण ठिकठिकाणी चर्चिले जात होते. मात्र सर्वांनाच सध्या या घटनेचा विसर पडला आहे की काय? असा सवालही माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केला आहे. (Tribute paid to Kopardi's unjust daughter by Maratha Kranti Morcha ssd73)

कोपर्डीच्या कन्येमुळे संपूर्ण मराठा समाज एकत्र झाला. आज पाच वर्षे पूर्ण झाली तरी सुद्धा त्या निष्पाप ताईला न्याय मिळाला नाही. ते नराधम आजही जिवंत आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्या नराधमांना फासावर लटकवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लढा चालूच ठेवणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी व्यक्त घेतली आहे..

कोपर्डीतील घटनेला पाच वर्षे लोटूनही जर त्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर न्यायालयावरचा विश्वास उडून जाईल. त्यामुळे कायद्यावरील विश्वास आणि महाराजांच्या महाराष्ट्रात अशी कृती करणाऱ्या नराधमांना तत्काळ फासावर लटकवावे; अन्यथा यापुढे गनिमीकाव्याने आंदोलन करावे लागेल, अशी संतप्त भावना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण पवार यांनी या वेळी व्यक्त केली.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत (District President of Sambhaji Brigade Somnath Raut) म्हणाले, जोपर्यंत कोपर्डीच्या ताईला न्याय मिळणार नाही तोवर आम्ही आंदोलन करत राहणार आहोत. त्याचबरोबर राज्यात कोणत्याही समाजाच्या आई-बहिणींसोबत असे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड कायम रस्त्यावरची लढाई लढणार आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी राज सरडे, बजरंग जगदाळे, रमेश हावळे, योगेश बंडगर, सौदागर चव्हाण, उमाकांत कारंडे, श्रीकांत जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT