sweet halwyache dagine
sweet halwyache dagine 
पश्चिम महाराष्ट्र

तिळगुळ दरात वाढ न झाल्याने संक्रांत गोड 

सकाळ वृत्तसेवा

सातारा:
बाजारात हलव्याचे दागिनेही मोठ्या प्रमाणात दाखल;
संक्रांत सणासाठी बाजारपेठेत तिळगुळ हलवा,हलव्याचे दागिने दाखल झाले आहेत.संक्रातीच्या निमित्ताने खरेदी केले जाणारे हे पदार्थ थंडीत आरोग्यास हितकारक असल्याने आतापासूनच त्यांना मागणी आहे. महागाईत वाढ झाली असली ,तरी तिळगुळाच्या दारात कोणतीही वाढ झाली नसल्याने यंदाची संक्रांत गोड होणार आहे. 
संक्रांत म्हटली,कि प्रथम आठवतात ते तिळगुळ.सर्वांना तिळगुळ देऊन तोंड गोड करणे हा या सणाचा महत्वाचा भाग.संक्रांत जवळ येताच किमान महिनाभर आधी यवसायिक हलवा,तिळगुळ तयारीच्या लागतात.त्यामुळे सध्या बाजारपेठेत तिळगुळ विक्रीस तयार आहे.विविध प्रकारचे तिळगुळ तयार केले जातात.काटेरी व सध्या तिळगुळास मोठी मागणी असते.बाजारात साधे तिळगुळ सध्या साधारण ९० ते १०० रुपये किलो आहेत;तर काटेरी तिळगुळ १२० ते १५० रुपये किलो आहेत,तसेच मोती हलवा २०० रुपये किलो आहे.पांढऱ्या शुभ्र तिळगुळाबरोबर रंगीत तिळगुळासही मागणी आहे. 

याबरोबरच तिळाचे छोटे लाडूही बाजारपेठेत मुबलक उपलब्ध आहेत.त्यामुळे कडक लाडू आणि मऊ लाडू असे दोन प्रकार आहेत,तसेच साखरेची रेवडी १०० ते १२० रुपये,तर गुळाची रेवडी ८० रुपये किलोने विकली जात आहे.

"आरर...महसूल, पाेलिसांचा असाही विक्रम
याशिवाय बाजारात हलव्याचे दागिनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत,यामध्ये लहान मुलांसाठी हलव्याचा श्रीकृष्ण सेट आहे.यामध्ये किरीट,हार ,बासरी,दोन बाजूबंद,दोन मनगटी व अंगठी या हलव्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.या सेटची किंमत त्यातील वास्तूप्रमाणे १०० ते २५०० रुपये आहे.

महिलांची पसंती 

याशिवाय महिलांसाठी हलव्याच्या दागिन्यांचा सेट उपलब्ध आहे.यामध्ये कर्णफुले ,बांगड्या ,नाथ,अंगठी, झुबे, बाजूबंद,मंगळसूत्र,कंबरपट्टा, किरिहार,मनगटी यांचा समावेश आहे.याची किंमत ५०० ते १२०० रुपये आहे.फक्त मोठा हार १०० रुपयांना आहे.नागरिक आवडीप्रमाणे दागिने,तिळगुळ खरेदी करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT