पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून वैभव साबळेंची नियुक्ती!

धर्मवीर पाटील,

काही महत्वाची वगळता सर्वच कामे रखडली होती. त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर होता. मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनावरही कोणाचा वचक नव्हता.

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेला अखेर मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झाली. गेली तीन महिने हे पद रिक्त होते. काल रात्री उशिरा इस्लामपूर नगरपालिकेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वैभव साबळे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने काल रात्री तसे आदेश जारी केले. मुख्याधिकारी अरविंद माळी यांची १९ जुनला पदोन्नतीने पंढरपूरला बदली झाल्यापासून इस्लामपूर नगरपालिकेत अधिकृत मुख्याधिकारी नव्हते. काही काळ पलूस मुख्याधिकारी तर मध्ये तहसीलदार रविंद्र सबनीस तर सध्या आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे इस्लामपूर नगरपालिकेची जबाबदारी होती.

काही महत्वाची वगळता सर्वच कामे रखडली होती. त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर होता. मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनावरही कोणाचा वचक नव्हता. अनेकांची कामे होत नसल्याने शहरातील नागरिक हतबल झाले होते. आज साबळे यांच्या निवडीचे आदेश पालिकेला प्राप्त होताच अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. सिधुदुर्ग येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारण्यापुर्वी साबळे यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याबाबत साबळे यांच्याशी संपर्क साधला असता 'सध्या परिक्षेनिमित्ताने मुंबईत आहे, परंतु लवकरात लवकर इस्लामपूर पालिकेचा पदभार स्वीकारु' असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT