Prime Minister's Housing Scheme 
पिंपरी-चिंचवड

‘राजकारण करण्याऐवजी गरिबांना लवकर घरे द्या’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेची सोडत ऐनवेळी रद्द झाल्याच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवार) शहरात अनेक प्रतिक्रिया उमटली. राजकारण करण्याऐवजी गरिबांना लवकरात लवकर घरे द्यावी, अशी प्रतिक्रिया विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.

कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, ‘घरकुलाच्या प्रश्‍नांवर राजकारण नको सर्वांना घरकुल द्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गरिबांच्या भावनांशी खेळू नये. लवकरात लवकर सोडत घेऊन नागरिकांना घर द्यावेत. कोरोनामुळे जगायचे कसे आणि भाडे कुठून भरायचे असा प्रश्‍न निर्माण झाला होता. लोक कशीबशी उपजीविका चालवत असून, आता मात्र नागरिक भाडे भरू शकत नाही.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माकपचे सचिव गणेश दराडे म्हणाले, ‘‘गोरगरीबांच्या स्वप्नांचा श्रेयवादामुळे चुराडा झाला आहे. महापालिकेने लोकांची मासिक भाडे देण्याची अर्थसंकल्पात तरतूद करावी. प्रोटोकॉलचे पालन न झाल्यामुळे सोडत रद्द करण्याची भूमिका अतिशय निषेधार्ह आहे. कोणालाही हक्काच्या घरापासून वंचित ठेवणार नाही, अशी घोषणा राजकारणी करताहेत, परंतु प्रत्येक योजनेत राजकारण सुरू आहे.’

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य गरीब जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत. आवास योजनेची सोडत रद्द झाली म्हणून महापौरांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी आंदोलन करता येत नाही. आयुक्तांनी, महापौरांचा राजीनामा घ्यावा.’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT