पिंपरी : गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून आम्ही येथे राहतोय. दरवर्षी पावसाळ्यात झोपड्यांमध्ये पाणी शिरते. रात्र-रात्र जागून काढावी लागते. रोजंदारीच्या कमाईतून चांगले घर कधी होणार? याचीच चिंता होती. पण, आता सरकारी योजनेमुळे आमच्यासाठी घरांचे काम सुरू झाले आहे. हक्काचे व स्वप्नातील घर मिळणार याचा खूप मोठा आनंद आहे, अशी भावना कासारवाडीतील हिराबाई लांडगे झोपडपट्टीतील रहिवाशांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
कासारवाडीतील रेल्वे फाटकापासून हाकेच्या अंतरावर लोहमार्गालगत नाल्याच्या काठावर हिराबाई लांडगे झोपडपट्टी आहे. 1970 मध्ये ही झोपडपट्टी घोषित आहे. एसआरए योजनेअंतर्गत झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थी झोपडीधारकांचे जवळच पत्राशेडमध्ये स्थलांतर केले असून, झोपड्यांच्या जागेवर टोलेजंग इमारत उभी राहात आहेत.
आकडे बोलतात
लाभार्थी म्हणाले...
आम्ही मूळचे कर्नाटकातील आहोत. चाळीस वर्षांपासून येथे राहते आहे. कष्टाची कामे केली. इतकी वर्ष झोपडीत काढले. आपले स्वतःचे पक्के घर होईल, असे कधी वाटले नव्हते. पण, आता स्वतःचे घर मिळणार आहे. याचाच मोठा आनंद आहे.
- सुग्राबी टाचूरआतापर्यंत खूप कष्टात दिवस काढले. आमच्या झोपड्यांच्या जागेवर मोठी बिल्डिंग उभी राहते आहे. तिथे आम्हाला चांगले घर मिळेल, असे सर्वजण सांगताहेत. त्याचीच मोठी खुशी आहे. असे घर मिळेल, असे कशी वाटले नव्हते. पण, आता घर मिळणार आहे.
- सायरा सिंदगीपहिले आमची झोपडी होती. आता पत्राच्या घरात आणले आहे. आमच्या झोपडीच्या जागेवर चांगली बिल्डिंग बांधली जात आहे. आता आम्हाला प्लॅट मिळणार आहे. आमच्यासारख्या अन्य सर्व लोकांनाही घर मिळाले पाहिजे.
- सय्यदबी पटेल
तांत्रिक अडचणींचे 140 बळी
महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडे 247 झोपडीधारकांची नावे आहेत. मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) 131 झोपडीधारकांचीच नोंद आहे. त्यापैकी सदोष नावे व अन्य तांत्रिक कारणांमुळे 24 झोपडीधारकांना अपात्र ठरविले आहे. 107 झोपडीधारकांसाठीच प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. 247 झोपडीधारकांमध्ये बहुतांश झोपड्या रेल्वेच्या हद्दीत आहेत. रेल्वे प्रशासनाने त्यांना नोटीसही दिलेल्या आहेत. त्यामुळे 116 झोपडीधारक साशंक असून, त्यांनी "आमचेही पुनर्वसन करा,' अशी मागणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. स्थानिक नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासमवेत येथील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले आहे.
अशा आहेत मागण्या
रेल्वेमुळे बाधित म्हणतात...
आम्ही तीस वर्षे झालीत, येथे राहात आहे. माझा जन्मच इथला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य कर आम्ही दरवर्षी भरत आहोत. पावसाळ्यात घरामध्ये पाणी शिरते. त्यावेळी खूप त्रास सहन करावा लागतो. रेल्वेकडून आम्हाला नोटीस आली होती. आम्हालासुद्धा पक्की घरे मिळाली पाहिजेत.
- गौरी राजपाल, रहिवासीआम्हाला लाइट, पाण्याची सुविधा आहे. आम्ही सर्व टॅक्सही भरतो आहे. आता फक्त पक्की घरे द्यायला हवीत. गेल्या 35 वर्षांपासून मी येथे राहतो आहे. महापालिकेने आम्हाला पात्र केले आहे. पण, एसआरएने अपात्र ठरविले आहे. सरकारने आमचाही घरासाठी विचार करायला हवा.
- सखाराम गायकवाड, रहिवासी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.